Uncategorized

विधानसभेला ‘लाडकी बहीण योजने’चा महायुतीला फायदा होणार का? सर्व्हेतून धक्कादायक माहितीसमोर

मुंबई : राज्यात लोकसभा निवडणुकीमध्ये महायुती सरकारला अपेक्षित यश मिळालं नाहीत्यानंतर राज्यातसत्ताधारी महायुतीने अनेक लोकोपयोगी योजना सुरू केल्या आहेतयामध्ये लाडकी बहीण योजनेचा देखीलसमावेश आहे.

या योजनेद्वारे राज्यातील महिलांना दरमहिना १५०० रूपयांची आर्थिक मदत सरकार देत आहेतराज्यातविधानसभा निवडणुका ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहेयाच अनुषंगानेसत्ताधारी पक्षाने ही योजना सुरू केलीयअसा आरोप विरोधक करत आहेतआता खरंच महायुतीलाविधानसभा निवडणुकीत ‘लाडकी बहीण योजनेचा फायदा होणार काहे जाणून घेवू या.

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनेक लोकोपयोगी योजना सुरूकेल्यातयामध्ये ‘लाडकी बहीण योजना‘ ही प्रमुख आहेसरकारने ८० लाख महिलांच्या खात्यावर तीनहजार रुपये जमा केले आहेतमहिला सक्षमीकरणावर भर देणारं हे पाऊल गेम चेंजर असल्याचं महायुतीनेम्हटलंययाबाबत राज्याचे ज्येष्ठ राजकीय विश्लेषक आणि सेफॉलॉजिस्ट दयानंद नेने यांनी १६ ऑगस्ट ते२५ ऑगस्ट दरम्यान राज्यात सर्वेक्षण केलंययामध्ये त्यांनी ‘लाडकी बहीण योजनेचा महायुतीला फायदाहोणार काअसा एक प्रश्न देखील विचारलेला होता.

सर्वेक्षण केलेल्या एकूण लोकांपैकी ४० टक्के लोकांनी महायुतीला फायदा होईलअसं सकारात्मकप्रतिसाद दिलायमात्र ३७ टक्के लोकांनी नकारार्थी उत्तर दिलंयतर २३ टक्के लोकांनी माहिती नसल्याचंनमूद केलंयमहायुती सरकारने लाडकी बहीण योजनेची लाभार्थ्यांना माहिती देण्यासाठी मोठे कार्यक्रमदेखील आयोजित केले होतेमहाआघाडीतील घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसने लाडकी बहीण योजनेवरनिवडणूकपूर्वी प्रचार केंद्रित केलायया योजनेमुळे महायुतीच्या बाजूने कोणतीही लाट निर्माण झालेलीनाहीअसं मत दयानंद नेने यांनी सर्वेक्षणाच्या निकालानंतर व्यक्त केलंय.

ही योजना निवडणूक स्टंट असल्याची प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केलीयसरकार फुकटात पैसे वाटप करतअसेल तर का सोडायचंअसं देखील अनेकजण म्हणत आहेतया योजनेत मोठा भ्रष्टाचार झाल्या अशीव्यक्तिगत प्रतिक्रिया नेने यांनी दिलीयकारण आर्थिकदृष्ट्या संपन्न असलेल्या कुटुंबातील अनेक महिलांनाया योजनेचा लाभ मिळालेला आहेयाबाबत राज्य सरकारने चौकशी करावीअसं देखील नेने म्हणालेआहेत.

यंदा राज्यात अर्थसंकल्पात महायुती सरकारने लाडकी बहीण योजना जाहीर केली होतीया योजनेंतर्गत २१ते ६५ वयोगटातील महिलांना दरमहा १५०० रुपये देण्याची घोषणा केली होतीया योजनेसाठी अर्जदारमहिलेच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त नसावंमहिलेच्या कुटुंबातील कोणतीहीसदस्य आयकर भरत असेलतर ती महिला या योजनेसाठी पात्र नाहीराज्यातील सुमारे दीड कोटी महिलाया योजनेसाठी पात्र ठरण्याची अपेक्षा आहे.

महाविकास आघाडीच्या नेत्यांनी या योजनेला थेट विरोध केला नसून प्रश्न उपस्थित केलेतही योजनानिवडणूक स्टंट असल्याची टीका विरोधकांकडून केली जातेयहरियाणा आणि जम्मूकाश्मीरमधीलनिवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर आता महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुका जाहीर होण्याचीशक्यता आहेयेत्या  ऑक्टोबरला निवडणूक आयोग महाराष्ट्र निवडणुकीच्या तारखा जाहीर करेलअसाअंदाज आहेऑगस्ट महिन्याच्या अखेरपर्यंत या योजनेचा किरकोळ लाभ महायुती सरकारला मिळतानादिसत असल्याचं सर्वेमधून दिसतंय

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button