सामाजिक
4 hours ago
मुखेडात गणरायाचे जल्लोषात आगमन! ढोल-ताशांच्या गजरात बाप्पांची प्रतिष्ठापना
श्रमिक एकता न्यूज़ नेटवर्क मुखेड : १४ सप्टेंबर २६ ढोल–ताशांचा दणदणाट, फटाक्यांची आतषबाजी आणि ‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया’च्या अखंड जयघोषाने संपूर्ण मुखेड शहर व परिसर भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाला आहे. गणेश चतुर्थीच्या मंगलदिनी लाडक्या गणरायाचे मुखेड शहरासह ग्रामीण भागात अत्यंत उत्साहात आणि जल्लोषात आगमन झाले. गणेश चतुर्थीनिमित्त सकाळ पासूनच शहरात सर्वत्र चैतन्याचे वातावरण होते. लाडक्या बाप्पाची मूर्तीआणि पूजेचे साहित्य खरेदीसाठी बाजारपेठेत भाविकांची मोठी लगबग दिसून आली. फुलांचे हार, सजावटीचे साहित्य, मखर आणि प्रसादासाठी मिठाई खरेदी करण्यासाठी शहरातील मुख्य बाजारपेठेत आबालवृद्धांची गर्दी उसळली होती.…
सामाजिक
5 hours ago
आयुष्यात येणारे अडथळे हे जीवनाला नवीन दिशा देतात -डॉ.राहुल कांबळे
सलग दोन वेळेस विदेशातील विद्यापीठानेडॉ.राहुल कांबळे यांना आंतरराष्ट्रीय डॉक्टरेट पदवी प्रधान सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय आदर्श डॉक्टर…
राजकीय
1 day ago
सर्वसामान्यांचे प्रश्न शासनापर्यंत पोहोचवण्यात पत्रकारांचे योगदान मोठे : दिलीपराव पाटील बेटमोगरेकर
मुखेड तालुका पत्रकार संघाच्या नूतन कार्यकारिणीचा काँग्रेसच्या वतीने सत्कार श्रमिक एकता न्यूज नेटवर्क मुखेड :-…
सामाजिक
3 days ago
दापका राजा-जळकोट मार्गावरील रखडलेला रस्ता तातडीने पूर्ण करा; नागरिकांचा प्रशासनाला इशारा
श्रमिक एकता न्यूज नेटवर्क मुखेड: १२ सप्टेंबर २६ दापका राजा ते जळकोट मार्गावरील सुमारे १ किलोमीटरचे…
शहर
4 days ago
आज नांदेडमध्ये पावसासाठी विशेष प्रार्थना; ईदगाह देगलूरनाका येथे नमाज-ए-इस्तिस्का
श्रमिक एकता न्यूज़ नेटवर्क नांदेड दाऊत शेख :- ११ सप्टेंबर २६ मराठवाड्यासह नांदेड जिल्ह्यात पावसाने मोठी ओढ दिली असून, पावसाळ्याचे जवळपास तीन महिनेउलटूनही अपेक्षित प्रमाणात पाऊस झालेला नाही. यामुळे शेतकरी आणि नागरिकांमध्ये चिंता वाढलीआहे. या पार्श्वभूमीवर पावसासाठी अल्लाहकडे विशेष प्रार्थना करण्याची नमाज–ए–इस्तिस्का अदा करण्यातयेणार आहे. शुक्रवार, ११ सप्टेंबर रोजी दुपारी ३.३० वाजता देगलूरनाका येथील ईदगाह मैदानावर हीविशेष नमाज अदा केली जाणार आहे. नमाज–ए–इस्तिस्का ही पाऊस पडावा आणि जनजीवनाला दिलासा मिळावा, यासाठी अल्लाहकडे विशेषदुआ व प्रार्थना करण्याची नमाज आहे. सध्याच्या पावसाच्या कमतरतेच्या पार्श्वभूमीवर मुस्लिम…
सामाजिक
4 days ago
दिव्यांगांच्या हक्कांवरून जांबमध्ये प्रशासन धारेवर; १५ दिवसांत लेखी उत्तर न दिल्यास आंदोलनाचा इशारा
५ टक्के निधी, घरकुल आणि योजनांच्या लाभाबाबत ग्रामपंचायतीला जाब; जिल्हा प्रशासनाच्याभूमिकेवरही तीव्र नाराजी श्रमिक एकता न्यूज़ नेटवर्क जांब (बु.): ११ सप्टेंबर २६ शासकीय योजना, सवलती आणि ५ टक्के राखीव निधी दिव्यांगांपर्यंत पोहोचत नसल्याने दिव्यांगबांधवांच्या हक्कांसाठी जांब (बु.) येथे आवाज उठवण्यात आला आहे. ग्रामपंचायतीने येत्या १५ दिवसांतदिव्यांग कल्याण योजनांबाबत लेखी उत्तर देऊन कार्यवाही न केल्यास ग्रामपंचायत व जिल्हाधिकारीकार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. स्थानिक ग्रामपंचायत सभागृहात ‘दिव्यांग, वृद्ध, निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र’चे संस्थापक अध्यक्षचंपतराव डाकोरे पाटील (कुंचेलीकर) यांच्या अध्यक्षतेखाली परिसरातील दिव्यांग बांधवांची महत्त्वपूर्णबैठक पार पडली. या बैठकीत स्थानिक प्रशासनाच्या कारभारावर गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले. बैठकीतील प्रमुख मागण्या…
Uncategorized
4 days ago
नांदेड-भोकर मार्गावरील सीताखंडी घाटात भीषण अपघात; भरधाव ट्रकच्या धडकेत टाटा मॅजिकचा चक्काचूर, ६ ठार तर ८ गंभीर जखमी
श्रमिक एकता न्यूज़ नेटवर्क भोकर: १० सप्टेंबर २६ नांदेड–भोकर महामार्गावर वाकद गावाजवळील सीताखंडी घाटात गुरुवारी…
सामाजिक
4 days ago
मेहनत आणि कुटुंबाची साथ असेल तर अशक्यही शक्य; डॉ. श्रीहरी बुडगेमवार यांनी मुंबईत पटकावलेविधी शाखेचे सुवर्णपदक
श्रमिक एकता न्यूज़ नेटवर्क मुखेड:- १० सप्टेंबर २६ स्वप्नांना मेहनतीची जोड आणि कुटुंबाची भक्कम साथ लाभली तर कोणतेही ध्येय अशक्य नसते,” हेमुखेडचे सुपुत्र डॉ. श्रीहरी बुडगेमवार यांनी आपल्या उत्तुंग यशातून सिद्ध करून दाखवले आहे. मुंबईविद्यापीठाशी संलग्न असलेल्या नामांकित सिद्धार्थ लॉ कॉलेजमधून एलएलबी परीक्षेत सलग तीन वर्षेप्रथम क्रमांक पटकावत त्यांनी मानाचे सुवर्णपदक प्राप्त केले. ७ सप्टेंबर रोजी सिद्धार्थ विधी महाविद्यालय (फोर्ट, मुंबई) च्या सभागृहात संपन्न झालेल्या दीक्षांतसोहळ्यात त्यांना या पदकाने सन्मानित करण्यात आले. या l कार्यक्रमाचे अध्यक्षपद महाराष्ट्र राज्याचे लोकायुक्त अध्यक्ष, मा. न्यायमूर्ती सुनील बी. शुक्रे यांनीभूषविले. तर प्रमुख पाहुणे म्हणून मा. न्यायमूर्ती सुरेंद्र तावडे, सिद्धार्थ लॉ कॉलेजचे प्राचार्य डॉ. के. सुधाकर रेड्डी, प्रा. डॉ. दादासाहेब सूर्यवंशी, प्रा. ॲड. दिशा पाटील आणि प्रा. ॲड. श्रद्धा राठोड आदीमान्यवर उपस्थित होते. आपले मनोगत व्यक्त करताना डॉ. श्रीहरी बुडगेमवार भावनिक झाले. ते म्हणाले: “स्वप्ने नक्कीच पूर्ण होतात, पण ती सत्यात उतरवण्यासाठी संपूर्ण कुटुंबाची साथ लागते. हे यश केवळमाझे नसून संघर्षाच्या काळात माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाचे आहे. हे सुवर्णपदक जितके माझेआहे, तितकेच ते माझी पत्नी अनुषा हिचे आहे. तिच्या निरपेक्ष प्रेमाने, संयमाने आणि खंबीर साथीशिवायहे यश शक्य नव्हते. त्याचबरोबर माझे गुरू, माता–पिता आणि शिक्षकांनी दिलेल्या मार्गदर्शनामुळेचमाझ्या विचारांना योग्य दिशा मिळाली.” त्यांनी आपल्या यशात वरिष्ठ, मित्र, कनिष्ठ सहकारी आणि हितचिंतकांच्या पाठिंब्याचाही कृतज्ञतापूर्वकउल्लेख केला. “न्यायाच्या मार्गावर चालण्याच्या प्रवासाची ही केवळ सुरुवात आहे,” असा ठाम निर्धारहीत्यांनी या वेळी व्यक्त केला. डॉ. श्रीहरी बुडगेमवार यांच्या या देदिप्यमान यशाबद्दल मुखेड तालुक्यासहसंपूर्ण नांदेड जिल्ह्यातून आणि सर्व स्तरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
Uncategorized
5 days ago
नांदेड जिल्ह्यात गणेशोत्सवात डॉल्बी सिस्टिमवर पूर्ण बंदी; नियमांच्या अंमलबजावणीसाठी मुखेड पोलिसांची शांतता समिती बैठक संपन्न
मुखेड (श्रमिक एकता न्यूज नेटवर्क | ०९ सप्टेंबर): आगामी गणेशोत्सव शांततेत, सौहार्दपूर्ण वातावरणात आणि सुरक्षितपणे पार पाडण्यासाठी नांदेड जिल्हाप्रशासन व पोलीस विभागाने कडक पावले उचलली आहेत. उत्सवादरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच तीव्र ध्वनिप्रदूषणामुळे नागरिकांच्या आरोग्यावर होणारे दुष्परिणाम टाळण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम १६३अन्वये संपूर्ण नांदेड जिल्ह्यात डॉल्बी सिस्टिमच्या वापरावर सक्त बंदी घालण्याचा आदेश जारी केला आहे. हा प्रतिबंधात्मक आदेश ७ सप्टेंबर २०२६ (मध्यरात्री १२:०० वा.) पासून ८ नोव्हेंबर २०२६ (मध्यरात्री१२:०० वा.) पर्यंत लागू राहणार असून, या कालावधीत डॉल्बी मालक, चालक अथवा अन्य कोणासही ही यंत्रणा वाजवण्यास किंवा चालवण्यास पूर्णपणे मनाई करण्यात आली आहे. दहीहंडी, श्री गणेश स्थापना व विसर्जन मिरवणुकांमध्ये डॉल्बीच्या कानठळ्या बसवणाऱ्या आवाजामुळे…
सामाजिक
6 days ago
कौठा येथे पूरग्रस्तांचे आमरण उपोषण सुरू; ४१ वर्षांनंतरही पुनर्वसनाचा प्रश्न प्रलंबित
श्रमिक एकता न्यूज़ नेटवर्क कंधार:- ०८ सप्टेंबर कंधार तालुक्यातील कौठा येथे वारंवार येणाऱ्या पुरामुळे गावकऱ्यांच्या पुनर्वसनासाठी मंजूर करण्यात आलेले प्लॉट अद्यापही वाटप न झाल्याने संतप्त ग्रामस्थांनी ०७ सप्टेंबर पासून आमरण उपोषणास बसले आहे. जोपर्यंत प्लॉट धारकांना प्रत्यक्ष जागा दाखवून दिली जात नाही, तोपर्यंत हे उपोषण सुरूच राहील, असा थेट इशारा राजेश विठ्ठल देशमुख यांनी प्रशासनाला दिला आहे. कौठा गावात वारंवार पूरस्थिती निर्माण होत असल्याने शासनाने गावकऱ्यांच्या पुनर्वसनाचा निर्णय घेतलाहोता. त्यानुसार, सन १९८३ मध्ये गट क्रमांक ७६३ मध्ये तब्बल ३५७ प्लॉट मंजूर करण्यात आले होते. मात्र, चार दशकांहून अधिक काळ लोटूनही प्रशासनाने अद्याप प्लॉट धारकांना प्रत्यक्ष जागा आणि प्लॉट…
























