सामाजिक
    6 mins ago

    मुखेड तालुक्यात अवकाळीचा तडाखा; रब्बी पिके आडवी, बळीराजा संकटात

    मुखेड (प्रतिनिधी): २४ फेब्रुवारी २६ तालुक्यात सोमवारी (दि. २३) दुपारी अचानक आलेल्या जोरदार वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने रब्बी हंगामातील पिकांचे मोठे नुकसान केले आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे हाता तोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने शेतकरी वर्ग मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा चटका वाढत असतानाच, सोमवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास वातावरणात अचानक बदल झाला. ढगांच्या गडगडाटासह आणि वेगवान वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली. सुमारे पाऊण ते एक तास चाललेल्या या पावसामुळे शेतात पाणी साचले असून काढणीला आलेल्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. तालुक्यात सध्या ज्वारी, गहू, हरभरा आ ,आणि करडई ही पिके अंतिम टप्प्यात आहेत. अनेक ठिकाणीज्वारी काढणीला आली होती, तर गहू दाणे भरण्याच्या अवस्थेत होता. मात्र, वादळी वाऱ्यामुळे उभी पिके जमिनीला लागली आहेत. पावसामुळे हरभऱ्यालाही फटका बसला असून पिकांचा दर्जा घसरण्याची भीतीव्यक्त होत आहे.…
    क्राईम
    7 hours ago

    मुखेड वनविभाग ‘कोमात’, लाकूड तस्कर ‘जोमात’; अवैध वृक्षतोडीने पर्यावरणाचे मोठे नुकसान

    मुखेड प्रतिनिधी: २४ फेब्रुवारी २६ निसर्गाचा समतोल राखण्यासाठी एकीकडे वृक्षारोपणाचे कोट्यवधींचे टार्गेट दिले जाते, तर दुसरीकडे मुखेड तालुक्यामध्ये वनविभागाच्या नाकाखाली वनसंपदेची दिवसाढवळ्या कत्तल सुरू आहे. मुखेड तालुक्यातील बारहाळी , मुक्रमाबाद, जाहुर, राजूरा, आंबुलगा , ईडग्याल ही गावे कर्नाटक व तेलंगणा राज्याच्या अगदी जवळ असल्यामुळे या भागातून दररोज सुमारे ५० हून अधिक  ट्रॅक्टर आणि ट्रक लाकूड भरून राज्यात व परराज्यात लाकूड अवैध मार्गाने विकले जात आहे . विशेष म्हणजे, यासंदर्भात वारंवार तक्रारी करूनही वनविभाग ढिम्म असल्याने “वनविभाग कोमात आणि तस्कर जोमात” अशी म्हणण्याची वेळ आली आहे. ​मुक्रमाबाद , बाऱ्हाळी , जाहूर , राजूरा, आंबुलगा , ईडग्याल…
    क्राईम
    20 hours ago

    सावधान! दहावी-बारावी परीक्षेत गैरप्रकार केल्यास होणार जेल; नांदेड जिल्ह्यात ‘महाराष्ट्र गैरप्रकार प्रतिबंध कायदा’ लागू

    नांदेड प्रतिनिधी:- २३ फेब्रुवारी २६ जिल्ह्यात दहावी व बारावीच्या परीक्षांमध्ये गैरप्रकार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात…
    शैक्षणिक
    1 day ago

    मुखेडात शिष्यवृत्ती परीक्षेत ‘सावळा गोंधळ’; मराठीच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी तर इंग्रजीच्यांना मराठीचे पेपर!

    मुखेड (प्रतिनिधी): २३ फेब्रुवारी २६ दि २२ फेब्रुवारी रोजी पार पडलेल्या पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत मुखेड येथील परीक्षा केंद्रावरप्रशासनाचा मोठा हलगर्जीपणा समोर आला आहे. मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाचे, तरइंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना मराठीचे पेपर वाटप झाल्याने परीक्षा केंद्रावर एकच गोंधळ उडाला. याप्रकारामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. नेमका प्रकार काय? मिळालेल्या माहितीनुसार, परीक्षा सुरू होताच पर्यवेक्षकांनी विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिकांचे वाटप केले. मात्र, काही वेळातच विद्यार्थ्यांच्या लक्षात आले की, त्यांना त्यांच्या माध्यमाचे पेपर मिळालेले नाहीत. मराठीमाध्यमाच्या वर्गात इंग्रजीचे पेपर गेले, तर सेमी–इंग्रजी व इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना मराठीमाध्यमाच्या प्रश्नपत्रिका देण्यात आल्या. ही चूक लक्षात येईपर्यंत बराच वेळ निघून गेला होता. १५ मिनिटे…
    सामाजिक
    2 days ago

    ९ वर्षीय मेहरिन धुंदी यांचा आयुष्यातील पहिला ‘रोजा’ पूर्ण

    मुखेड प्रतिनिधी:- २२ फेब्रुवारी २६ रमजानच्या पवित्र महिन्यात लहान मुलांमध्येही उपासनेचा मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. याचउत्साहाच्या वातावरणात मेहरिन मुजीब धुंदी या चिमुकलीने आपल्या आयुष्यातील पहिला रोजायशस्वीपणे पूर्ण केला आहे. भाजपाचे युवा नेते खाजा धुंदी यांची…
    शैक्षणिक
    2 days ago

    प्रशासनाच्या कडक निगराणीत नरसिंह विद्यामंदिर उमरदरी केंद्रावर शालांत परीक्षा सुरळीत

    मुखेड: प्रतिनिधी २२ फेब्रुवारी २६ महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणारी माध्यमिक शालांतप्रमाणपत्र इयत्ता १० वी व १२ वी परीक्षा सध्या सर्वत्र सुरू आहे. या पार्श्वभूमीवर, जनता शिक्षण प्रसारकमंडळ नरसिंह विद्यामंदिर उमरदरी येथील परीक्षा केंद्रावर प्रशासनाच्या कडक निगराणीत आणि शिस्तबद्ध वातावरणात परीक्षा अत्यंत सुरळीतपणे पार पडत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. राज्य शासनाने जाहीर केलेल्या ‘कॉपीमुक्त अभियान‘ अंतर्गत उमरदरी केंद्रावर विशेष खबरदारी घेतलीजात आहे. परीक्षेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी केंद्र संचालक आणिपर्यवेक्षकांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांची कसून तपासणीकेल्यानंतरच त्यांना परीक्षा दालनात प्रवेश दिला जात आहे. विश्वासनीय सुत्रांकडून सांगण्यात आले की काही असामाजिक तत्त्वांद्वारे व शाळेतील हकालपट्टी केलेल्या एका माजी मुख्याध्यापकाला हाताशी धरून खंडणीखोर तोतया पत्रकार हा या केंद्रावर मोठ्यारकमा घेऊन परीक्षा केंद्रावर काॅपी चालवण्यासाठी आटापिटा करत कर्मचाऱ्यांवर दबाव आणत होता पण संस्थेचे अध्यक्ष शिवाजीराव जाधव यांनी कुठलाही दबाव न  घेता पोलिस आणि शिक्षण खात्यातील…
    क्राईम
    2 days ago

    नांदेडमध्ये १५,५६९ बनावट जन्म प्रमाणपत्रांचा घोटाळा

    ▫️झारखंडमधून पाच जण अटकेत, मास्टरमाइंड बिहारचा नांदेड प्रतिनिधी:- २२ फेब्रुवारी २६ नांदेड : डिजिटल व्यवस्थेचा गैरवापर करत नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील सावळेश्वर(लोकसंख्या सुमारे १५००) या गावातून तब्बल १५ हजार ५६९ बनावट जन्म नोंदणी प्रमाणपत्रेकाढल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी नांदेड पोलिसांनी झारखंडमधून पाचजणांना अटक केली असून मुख्य सूत्रधार बिहारमधील असल्याचे तपासात समोर आले आहे. त्यासाठी पोलिसांचे पथक बिहारला रवाना झाले आहे. १५ दिवसांपूर्वी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी नांदेड दौऱ्यात हा प्रकार उजेडात आणला होता. झारखंडमधील एका व्यक्तीने सावळेश्वर येथून काढलेले जन्म प्रमाणपत्र बनावट असल्याचे समोर आल्यानंतर तपासाची चक्रे फिरू लागली. सुरुवातीला उस्माननगर पोलिस ठाण्यात अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपासाची सूत्रे लोहा येथील पोलिस निरीक्षक नवनाथ आयलाने यांच्याकडे देण्यात आली. सायबरपथकाच्या मदतीने झारखंडमधील गढवा येथून जितेंद्र कुमार सिंह, महेंद्र प्रताप सिंह, ओमप्रकाश मिश्रा, लक्ष्मी पंडित, सुमित कुमार सिंह व सतीश कुमार साहू यांना अटक करण्यात आली. हे सर्व आरोपी सध्यापोलिस कोठडीत आहेत. सीआरएस (Civil Registration System) पोर्टलवरील सावळेश्वर ग्रामपंचायतीचा यूजर आयडी वपासवर्ड झारखंडमधील आयपी अॅड्रेसवरून हॅक करण्यात आला होता. मे ते नोव्हेंबर २०२५ याकालावधीत १५ हजारांहून अधिक बनावट प्रमाणपत्रे तयार करण्यात आली. या रॅकेटमध्ये व्हॉट्सअॅपग्रुप, दलाल व सायबर कॅफे चालकांचा सहभाग असल्याचेही तपासात उघड झाले आहे.…
    संपादकीय
    3 days ago

    डिजिटल साखळदंड: आपण मोबाईलचे ‘स्मार्ट’ गुलाम झालो आहोत का?

    मुखेड प्रतिनिधी:- २१ फेब्रुवारी २१ व्या शतकात मानवाने केलेली सर्वात मोठी क्रांती म्हणजे ‘स्मार्टफोन‘. एका छोट्याशा उपकरणातसंपूर्ण जग सामावले आहे, ही कल्पनाच अद्भूत होती. पण आज, काही वर्षांनंतर, हेच साधन आपल्याप्रगतीचा मार्ग आहे की आपल्या अधोगतीचे कारण, हा प्रश्न विचारला जात आहे. “मोबाईलमुळे आपण गुलाम झालो आहोत का?” याचे उत्तर दुर्दैवाने ‘हो‘ कडे झुकताना दिसत आहे. १. ‘नोटिफिकेशन’चा अघोषित हुकूम पूर्वी गुलाम हे मालकाच्या एका आवाजावर धावत असत. आज आपल्या खिशातील मोबाईलची एक‘रिंग‘ किंवा ‘नोटिफिकेशन‘चा आवाज आपल्याला आपले महत्त्वाचे काम सोडून स्क्रीनकडे वळायलालावतो. मग ते काम जेवणाचे असो, अभ्यासाचे असो किंवा कोणाशी तरी महत्त्वाचे बोलण्याचे. आपणत्या एका आवाजाचे इतके गुलाम झालो आहोत की, तो आवाज आला नाही तरी आपण वारंवार मोबाईलतपासून पाहतो . ही मानसिक गुलामी नाही तर काय? २. वेळेची आणि…
    संपादकीय
    4 days ago

    अल्पवयीन मुलांमधील मोबाईलचे व्यसन: एक वाढती चिंता

    मुखेड प्रतिनिधी:- २० फेब्रुवारी २६ संपादक:- आसद बल्खी आजच्या आधुनिक युगात मोबाईल फोन हा प्रत्येकाच्या हातातील अविभाज्य भाग बनला आहे. मोठ्यांपासून लहानांपर्यंत सर्वजण मोबाईलचा वापर करताना दिसतात. परंतु विशेष चिंतेची बाब म्हणजे अल्पवयातील मुले मोबाईलच्या व्यसनात अडकत चालली आहेत. ही समस्या केवळ कुटुंबा पुरती मर्यादित नसून समाजासाठीही धोकादायक ठरत आहे. लहान वयातील मुलांना सुरुवातीला मोबाईल खेळण्यासाठी किंवा व्हिडिओ पाहण्यासाठी दिला जातो. पालकांच्या दृष्टीने तो काही काळ शांत बसावा म्हणून हा सोपा उपाय असतो. पण हळूहळू ही सवयगरज बनते आणि नंतर व्यसनात रूपांतर होते. मोबाईलवरचे गेम्स, सोशल मीडियावरील व्हिडिओ, कार्टूनआणि विविध अॅप्स यामुळे मुलांचे लक्ष अभ्यासापासून दूर जाते. मोबाईलच्या अतिवापरामुळे मुलांच्या शारीरिक व मानसिक आरोग्यावर परिणाम होतो. सतत स्क्रीनकडेपाहिल्यामुळे डोळ्यांचे विकार वाढतात, झोपेचा त्रास होतो आणि डोकेदुखीची समस्या निर्माण होते. तसेचबाहेर खेळण्याची सवय कमी झाल्यामुळे शारीरिक हालचाली कमी होतात. मानसिकदृष्ट्याही मुलेचिडचिडी, एकलकोंडी आणि अस्वस्थ बनतात. मोबाईलच्या व्यसनामुळे कुटुंबातील संवादही कमी होतो. आई–वडील आणि मुलांमध्ये प्रत्यक्षसंवादाऐवजी स्क्रीनचा अडथळा उभा राहतो. मित्रांसोबत खेळण्याऐवजी मुलं आभासी जगात रमूलागतात. त्यामुळे त्यांच्या सामाजिक कौशल्यांवरही परिणाम होतो.…
    शैक्षणिक
    4 days ago

    परीक्षेशी संबंधित नसलेली व्यक्ती केंद्र परिसरात आढळल्यास कठोर कारवाई- जिल्हाधिकारी राहूल कर्डिले

    नांदेड दि. २० फेब्रुवारी :- आज दि २० फेब्रुवारी रोजी इयत्ता १० वीची परीक्षा जिल्ह्यातील…
    • शहर

      शेतकरी नेते भाई ॲड नारायण गोले पाटील यांच्या जनसेवेची १८ वर्ष.. 

      माजलगाव:- १८ जुलै २५ तसं तर २००७ हे साल आयुष्यातील महत्त्वाच्या तीन गोष्टीचं साक्षीदार आहे, पहिलं २००७ ला एल एलबी चं शिक्षण पूर्ण झालं, मी एल एल बी चांगल्या मार्काने पास झालो, दुसरं परीक्षा मार्चमध्ये झाली, आणि २१ एप्रिल २००७ रोजी मी विवाह बंधनात अडकलो, तिसरं २००७ च्या मे महिन्यातच मी माजलगाव जिल्हा व सत्र न्यायालयात प्रॅक्टिस करण्यासाठी माझे गुरु ॲड. व्हि.जी.तिडके साहेब यांच्याऑफिसला आलो, तेथे मला ॲड. बाबुराव तिडके, ॲड. साहेबराव आचार्य, ॲड.जाधवर मॅडम, ॲड हरिभाऊ बडे हे सहकारी मिळाले, यामध्ये खास करून ॲड बाबुराव तिडके यांना मी आणि आमचे सहकारी नाना म्हणायचो, नाना म्हणजे अगदी सरळ, साधा, प्रत्येकाला आपलं समजणारा, आलेल्या प्रत्येक पक्षकारांना आपुलकीने बोलणारा, त्यांच्या हृदयात घर करणारा एखादा पक्षकार खूपच गरीबघरचा किंवा परिस्थितीने गांगारलेला असेल तर नाना त्याला अगदी तिकिटाला सुद्धा पैसे द्यायचे.. त्यावेळीमी नाना सोबत जास्त वेळ घालवायचो, न्यायालयातील कामकाजाच्या बारीक–बारीक गोष्टी त्यांना निसंकोच विचारायचो, अगदी अर्ज लिहिण्या पासून दावा कसा तयार करायचा, दावा दाखल कसाकरायचा, दावा दाखल केल्यानंतर तो पुढे कोण कोणत्या स्टेज ला लागतो, पहिल्या स्टेज मध्ये आपणकाय करायचे, दुसऱ्या स्टेज मध्ये काय करायचे, तिसऱ्या स्टेज मध्ये काय करायचे हे अगदी लहान मुलासारखं विचारायचो, उलट तपास कसा घ्यायचा, उलट तपासात नेमकं काय आलं पाहिजे, पक्षकाराला तोप्रश्न कशा पद्धतीने विचारायचा, उलट तपासात साक्षीदार आपल्याला पाहिजे तसे उत्तर देत नसल्यासआपण कुठला प्रश्न विचारायचा, हाजरी माफीच्या अर्ज काय कारण लिहायचं हे सगळं विचारायला मलाकधीच लाज वाटली नाही, त्याचंही कारण होतं नाना जसे सगळ्यांशी आपुलकीने वागायचे त्याहीपेक्षामाझ्याशी अधिकच आपुलकीने जिव्हाळ्याने वागायचे, मला चांगलं अठवतयं २००७ मध्ये अगदी ऑगस्ट महिन्यात म्हणजे मला त्यावेळी वकिलीत ला “व” देखील कळत नव्हता त्यावेळी मला नानांनी माजलगाव येथील दुसरे सह दिवाणी न्यायाधीश महेश नातू साहेब यांच्या न्यायालयात दिवाणी दाव्याच्या एका प्रकरणात उलट तपास समोर बसून घ्यायला लावला होता, खरं तर त्या  उलट तपासातला प्रत्येक प्रश्ननानांनी मला माझ्या शेजारी बसून  कागदावर वरचेवर लिहून दिलेला व्हता, याच्या पुढे जाऊन नानांनीमला पहिले दिवाणी न्यायाधीश व. अ.अ. ग देशमुख साहेब यांच्या न्यायालयात मनाई हुकूमाच्या अर्जावर युक्तिवाद करायला लावला होता आणि विशेष म्हणजे त्या प्रकरणात आम्हाला  मनाई हुकूम मिळाला होता, पुढे काही काळ माझी नाना सोबत चांगली गट्टी जमली होती, अगदी सकाळी, संध्याकाळी ऑफिसला जायचो, संध्याकाळी सिनियर तिडके दादा ऑफिसमध्ये कधी यायचे, कधी नाही यायचे, पणनाना मात्र दररोज संध्याकाळी ऑफिसमध्ये येऊन दुसऱ्या दिवशीच्या बोर्डावरील फायली काढायचे अनंमला फक्त फाईल वाचा म्हणायचे, मी प्रत्येक फाईल वाचायचो प्रत्येक फाईल मधील परिस्थिती वेगळीअसायची, प्रकरण वेगळे असायचे, ते काही लवकर लक्षात यायचे नाही, मग त्याबाबत मी नानांना…

      Read More »
    • कष्टाचं चीज झालं; कष्टाळू मुलगा शेख रियाज़ झाला साहेब

    • मुखेड शहरातील विनापरवाना बाबासाई पेट्रोल पंप सिल; नगरपरिषदेची धडक कारवाई

    • प्रवाशांची गैरसोय करणाऱ्या मुखेड आगार प्रमुखावर कार्यवाहीची मागणी.

    • मुखेड येथे आजपासून तीन दिवसीय शिवजन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन!

    देश-विदेश

    • देश-विदेश

      भारताचा कोहिनूर हरपला, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे निधन

      जगाला भारताची अर्थव्यवस्था खुले करणारे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे निधन झाले आहे. मनमोहन सिंग यांना श्वास घेण्यास त्रास होत होता  गुरुवारी रात्री उपचारासाठी त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ते 92 वर्षांचेहोते. 2004 ते 2014 असे दहा वर्ष ते देशाचे पंतप्रधान होते. विद्वान, मृदू, मितभाषी आणि संवेदनशील नेता म्हणून मनमोहन सिंग यांची ओळख होती. 33 वर्षे तेराज्यसभेचे सदस्य होते. तर देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी यांच्यानंतर 10 वर्ष पंतप्रधान राहणारे पहिले पंतप्रधान होते. डॉ. मनमोहन सिंग 1991 पासून राज्यसभेचे सदस्य होते जिथे ते 1998-2004 पर्यंत विरोधी पक्षनेते होते. 2004 आणि 2009 मध्ये काँग्रेस पक्षाच्या ऐतिहासिक विजयानंतर त्यांनी 22 मे 2004 आणि पुन्हा 22 मे 2009 रोजी पंतप्रधानपद स्वीकारले होते. डॉ. सिंग यांची विकासाप्रती असलेली बांधिलकी आणित्यांच्या अनेक कर्तृत्वाची ओळख त्यांना बहाल करण्यात आलेल्या अनेक सन्मानांद्वारे करण्यात आली आहे. यामध्ये 1987 मध्ये पद्मविभूषण, 1993 मध्ये युरो मनी अवॉर्ड ऑफ द इयर ऑफ द इयर, 1993 आणि1994 या दोन्ही वर्षातील अर्थमंत्र्यांचा आशिया मनी पुरस्कार आणि 1995 मध्ये भारतीय विज्ञान काँग्रेसचाजवाहरलाल नेहरू जन्मशताब्दी पुरस्कार यांचा समावेश आहे. डॉ. मनमोहन सिंग यांचा जन्म 26 सप्टेंबर 1932 रोजी पंजाबमध्ये झाला. त्यांनी 1952 मध्ये पंजाबविद्यापीठातून अर्थशास्त्रात पदवी आणि 1954 मध्ये पदव्युत्तर पदवी प्राप्त केली. त्यांनी 1957 मध्ये केंब्रिजविद्यापीठातून त्यांचे इकॉनॉमिक ट्रायपोस पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी 1962 मध्ये ऑक्सफर्ड विद्यापीठातूनअर्थशास्त्रात डी. फिल केले होते. तर 1971 मध्ये भारत सरकारच्या वाणिज्य मंत्रालयात आर्थिक सल्लागार म्हणून रुजू झाले. त्यांना लवकरच1972 मध्ये वित्त मंत्रालयात मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून पदोन्नती देण्यात आली होती. UNCTAD सचिवालयात अल्पावधीत काम केल्यानंतर त्यांना दक्षिण आयोगाचे महासचिव म्हणून नियुक्त करण्यातआले. याशिवाय डॉ. सिंग यांनी वित्त मंत्रालयात सचिव, नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष, भारतीय रिझर्व्हबँकेचे गव्हर्नर, पंतप्रधानांचे सल्लागार आणि विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष अशी पदेही भूषवलीहोती.

      Read More »
    • तबला वादक आणि पद्मविभूषण उस्ताद झाकीर हुसेन यांचे निधन; वयाच्या 73 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

    आर्थिक

    • क्राईम

      नांदेडमध्ये १५,५६९ बनावट जन्म प्रमाणपत्रांचा घोटाळा

      ▫️झारखंडमधून पाच जण अटकेत, मास्टरमाइंड बिहारचा नांदेड प्रतिनिधी:- २२ फेब्रुवारी २६ नांदेड : डिजिटल व्यवस्थेचा गैरवापर करत नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील सावळेश्वर(लोकसंख्या सुमारे १५००) या गावातून तब्बल १५ हजार ५६९ बनावट जन्म नोंदणी प्रमाणपत्रेकाढल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी नांदेड पोलिसांनी झारखंडमधून पाचजणांना अटक केली असून मुख्य सूत्रधार बिहारमधील असल्याचे तपासात समोर आले आहे. त्यासाठी पोलिसांचे पथक बिहारला रवाना झाले आहे. १५ दिवसांपूर्वी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी नांदेड दौऱ्यात हा प्रकार उजेडात आणला होता. झारखंडमधील एका व्यक्तीने सावळेश्वर येथून काढलेले जन्म प्रमाणपत्र बनावट असल्याचे समोर आल्यानंतर तपासाची चक्रे फिरू लागली. सुरुवातीला उस्माननगर पोलिस ठाण्यात अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपासाची सूत्रे लोहा येथील पोलिस निरीक्षक नवनाथ आयलाने यांच्याकडे देण्यात आली. सायबरपथकाच्या मदतीने झारखंडमधील गढवा येथून जितेंद्र कुमार सिंह, महेंद्र प्रताप सिंह, ओमप्रकाश मिश्रा, लक्ष्मी पंडित, सुमित कुमार सिंह व सतीश कुमार साहू यांना अटक करण्यात आली. हे सर्व आरोपी सध्यापोलिस कोठडीत आहेत. सीआरएस (Civil Registration System) पोर्टलवरील सावळेश्वर ग्रामपंचायतीचा यूजर आयडी वपासवर्ड झारखंडमधील आयपी अॅड्रेसवरून हॅक करण्यात आला होता. मे ते नोव्हेंबर २०२५ याकालावधीत १५ हजारांहून अधिक बनावट प्रमाणपत्रे तयार करण्यात आली. या रॅकेटमध्ये व्हॉट्सअॅपग्रुप, दलाल व सायबर कॅफे चालकांचा सहभाग असल्याचेही तपासात उघड झाले आहे. महाराष्ट्रासह उत्तरप्रदेश, झारखंड, तेलंगणा, बिहार व पश्चिम बंगाल या राज्यांपर्यंत या रॅकेटची व्याप्ती असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. पोलिस तपास सुरू आहे.

      Read More »
    • विद्युत शॉक लागून बैलाचा मृत्यू; कोळपणी करताना विद्युत पोलचा घात

    • मुखेड शहरातील घटना दुचाकीच्या डिक्कीतून चोरट्याने पळविली ७ लाख ७० हजारांची रक्कम

    सामाजिक

      सामाजिक
      6 mins ago

      मुखेड तालुक्यात अवकाळीचा तडाखा; रब्बी पिके आडवी, बळीराजा संकटात

      मुखेड (प्रतिनिधी): २४ फेब्रुवारी २६ तालुक्यात सोमवारी (दि. २३) दुपारी अचानक आलेल्या जोरदार वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने रब्बी हंगामातील पिकांचे मोठे नुकसान केले आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे हाता तोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने शेतकरी वर्ग मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा चटका वाढत असतानाच, सोमवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास वातावरणात अचानक बदल झाला. ढगांच्या गडगडाटासह आणि वेगवान वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली. सुमारे पाऊण ते एक तास चाललेल्या या पावसामुळे शेतात पाणी साचले असून काढणीला आलेल्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. तालुक्यात सध्या ज्वारी, गहू, हरभरा आ ,आणि करडई ही पिके अंतिम टप्प्यात आहेत. अनेक ठिकाणीज्वारी काढणीला आली होती, तर गहू दाणे भरण्याच्या अवस्थेत होता. मात्र, वादळी वाऱ्यामुळे उभी पिके जमिनीला लागली आहेत. पावसामुळे हरभऱ्यालाही फटका बसला असून पिकांचा दर्जा घसरण्याची भीतीव्यक्त होत आहे. वादळी वाऱ्यामुळे केवळ पिकांचेच नव्हे, तर काही ठिकाणी घरांवरील पत्रे उडाल्याच्या आणि झाडेपडल्याच्या घटनाही घडल्या आहेत. या अचानक आलेल्या संकटामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. कृषी विभाग आणि महसूल प्रशासनाने तात्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडूनमदत जाहीर करावी, अशी मागणी मुखेड तालुक्यातील ग्रामस्थांकडून केली जात आहे.
      सामाजिक
      2 days ago

      ९ वर्षीय मेहरिन धुंदी यांचा आयुष्यातील पहिला ‘रोजा’ पूर्ण

      मुखेड प्रतिनिधी:- २२ फेब्रुवारी २६ रमजानच्या पवित्र महिन्यात लहान मुलांमध्येही उपासनेचा मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. याचउत्साहाच्या वातावरणात मेहरिन मुजीब धुंदी या चिमुकलीने आपल्या आयुष्यातील पहिला रोजायशस्वीपणे पूर्ण केला आहे. भाजपाचे युवा नेते खाजा धुंदी यांची ती  पुतणी आहे केवळ ९ वर्षांच्या असलेल्या अलिजा यांनी कडक उन्हाची आणि तहानेची तमा न बाळगता पहाटेपासूनसंध्याकाळपर्यंत मोठ्या धैर्याने हा उपवास पाळला. लहान वयातच दाखवलेली ही धार्मिक ओढ आणिसंयम पाहून त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. संध्याकाळी इफ्तारच्या वेळी अलिजा यांचे अभिनंदन करण्यासाठी कुटुंबातील आजोबा करीमसाब…
      सामाजिक
      6 days ago

      दुःखद वार्ता: सेवानिवृत्त सहायक महसूल अधिकारी शेख गुलाब यांचे निधन

      मुखेड/हळणी: दि १८ फेब्रुवारी २६ सेवानिवृत्त सहायक महसूल अधिकारी शेख गुलाब यांचे दुःखद निधन झाले आहे. त्यांच्या निधनानेकुटुंबीयांवर तसेच सामाजिक ,शासकीय क्षेत्रात व हळणी परिसरात शोककळा पसरली आहे. शेख गुलाब यांनी आपल्या सेवाकाळात प्रामाणिकपणे व निष्ठेने कार्य केले. महसूल विभागात सहायकमहसूल अधिकारी म्हणून त्यांनी अनेक वर्षे जबाबदारी सांभाळत जनतेची सेवा केली. त्यांच्या कामातीलपारदर्शकता, कर्तव्यदक्षता आणि साधेपणा यामुळे ते सर्वांच्या आदरास पात्र ठरले होते. सेवानिवृत्तीनंतरही त्यांनी सामाजिक कार्यात सहभाग घेतला आणि समाजातील विविध उपक्रमांनापाठिंबा दिला. त्यांच्या निधनामुळे समाजाने एक कर्तव्यनिष्ठ व सज्जन व्यक्तिमत्व गमावले आहे. त्यांच्या आठवणी स्मृतीसुगंधासारख्या नेहमीच सर्वांच्या मनात जिवंत राहतील. त्यांच्या पश्चात कुटुंबीय, नातेवाईक आणि मित्रपरिवार असा मोठा परिवार आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो व कुटुंबियांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो, हीच श्रमिक एकता न्यूज परिवाराकडून प्रार्थना अंत्यविधी स्थळ मुळगाव हळणी येथे आज दि १८ फेब्रुवारी सायंकाळी ०३:०० वाजता. होणार आहे
      सामाजिक
      2 weeks ago

      नांदेड जिल्ह्यात 1 हजार 362 आपले सरकार सेवा केंद्र मंजूर

      ▫️14 ते 23 फेब्रुवारी या कालावधीत ऑनलाईन अर्ज करण्याचे जिल्हाधिकारी यांचे आवाहन नांदेड दि. 12 फेब्रुवारी : नांदेड जिल्ह्यातील ग्रामपंचायत…

      संपादकीय

      Back to top button