शासनाच्या दर्लक्षामुळे राशन दुकानदारांचे नऊ महिन्यांचे कमिशन रखडले!

मुखेड प्रतिनिधी :-
अन्नधान्य वितरणा बाबतचे कमिशन न मिळाल्याने स्वस्त धान्य दुकानदार आर्थिक अडचणीत आला आहे. शासनाने त्यांची आर्थिक कोंडी नकरता त्वरित निर्धारित कमिशन द्यावे, अशी अपेक्षा स्वस्त धान्य दुकानदारांनी केली आहे
राज्य शासनाच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या वतीने विविध योजनाचे लाभार्थी व शिधापित्रका धारकांना, कुटुंब संख्येच्या आधारावर अन्नधान्य पुरवठा केला जातो. त्यासाठी गाविनहाय व शहरात प्रभाग निहाय स्वस्त धान्य दुकानदारा मार्फत शिधापित्रका धारकांना अन्नधान्य वाटप केले जाते. ह्यासाठी स्वस्त धान्य दुकानदारांना कमिशन म्हणून सरकारकडून काही रक्कम देण्यात येते. याच कमिशनवर स्वस्त धान्य दुकानदारांच्या संसाराचागाडा चालतो. गेल्या अनेक महिन्यांपासून धान्य वितरण प्रणाली सक्षमपणे काम करतांना दुकानदारांची दमछाक होत असली तरी मोबदला मिळत नसल्याने त्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. अनेक दुकानदारांचे उदरिनर्वाहाचे साधन आहे. दुकानाचे भाडे, लाईट बिल यासर्व गोष्टीसाठी पैसे लागतात. पण नऊ मिहन्यांपासून वितरण मावेजा न मिळाल्याने संबधित दुकानदार हतबल झाले आहेत. प्रशासनासह लोकप्रितिनधींचेही याकडे दुर्लक्ष झाले



