ओळखपत्र न लावल्यास शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांवर कारवाई होणार !

▫️११ वर्षांपूर्वी आदेश काढलेला असूनही त्याचे पालन न करणारे कर्तव्यचुकार शासकीय अधिकारी आणि कर्मचारी !
नांदेड प्रतिनिधी:- १२ सप्टेंबर
शासकीय कार्यालयात असतांना ओळखपत्र दर्शनी भागावर न लावणारे अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर कारवाई करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे. याविषयीचा आदेश ७ मे २०१४ यादिवशी राज्यशासनाने परिपत्रकाद्वारे दिला आहे; मात्र अनेक शासकीय अधिकारी आणि कर्मचारी ओळखपत्र दर्शनी भागात लावत नाहीत. त्यामुळे येथे येणार्या नागरिकांना अधिकारी आणि कर्मचारीयांना ओळखता न आल्याने अडचण येते या अगोदर सुध्दा अनेक वेळेस असे आदेश जारी झाले होते. पणत्याची पुर्ण अंमलबजावणी होतच नाही. १० सप्टेंबर २०२५ रोजी सामान्य प्रशासन विभागाचे उपसचिव शाहजहान मुलाणी यांच्या डिजिटल स्वाक्षरीने जारी झालेल्या परिपत्रकात असे नमुद आहे की, शासकीय अधिकारी आणि कर्मचारी कार्यालयात असतांना आपले ओळखपत्र दर्शनिय भागात लावत नाहीत. पणआता या परिपत्रकानुसार शासकीय कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी यांनी कार्यालयात प्रवेशकरतांना आणि कार्यालयात हजर असतांना आपले ओळखपत्र आपल्या शरिरावर दर्शनीय भागात लावणेबंधनकारक आहे. असे न करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांविरुध्द शिस्तभंगाची कार्यवाही होणार आहे. या आदेशाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी संबंधीत घटकप्रमुखाला देण्यात आली आहे. शासनाने आपले हे परिपत्रक संकेतांक २०२५०९१०१८०५५२२७०७ प्रमाणे शासनाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द केले आहे.


