दगडाने ठेचून मित्रानेच केला मित्राचा खून

पोलीसांनी आठ तासातच लावला खुनाचा छडा
मुखेड प्रतिनिधी:-
दबडे शिरूर शिवारातील हरिचंद्र तांड्याजवळ वन विभागाच्या जागेतील एका दरीत १० ऑक्टोबर रोजीअशोक ईश्वर चावरे (३५) वर्ष यांचा खून झाला होता. या खुनाचा तपास पोलिसांनी अवघ्या आठ तासातलावला असून हा खून दारूच्या नशेत मित्रानेच मित्राचा दगडाने ठेचून खून केल्याचे निष्पन्न झाले. यातीलआरोपी मित्र नरेश विनायक आंबेकर (२२) याला पोलिसांनी रात्री उशिरा अटक केली आहे.
शहरातील फुलेनगर येथे वास्तव्यात असणारे अशोक ईश्वर चावरे हा घरून कामावर जातो म्हणून ८ऑक्टोबर रोजी मंगळवारी सकाळी गेले. त्यांच्या सोबत याच गल्लीत राहणारे त्यांचा मित्र नरेश विनायक अंबेकर सोबत तो जांब येथे जाऊन दिवसभर दारू पिले व सोबत दारू घेऊन तांडाजवळ हरिचंद्र वनविभागाच्या जागेत पुन्हा दारू पित बसले. यात दोघांचा वाद निर्माण झाला. या वादात आंबेकर यांनीअशोकच्या डोक्यात दगड घातला. यात त्याचा जागीच मृत्यू झाल्याने प्रेताला फरफटत नेऊन एका दरीतफेकले. फरफटत नेल्यामुळे अशोकच्या पाठीला खरचटले होते. दरम्यान पोलिसांनी वेगाने तपास करूनआरोपीला आठ तासातच अटक केली. या प्रकरणी मयताच्या भावाने दिलेल्या तक्रारीवरून आरोपी नरेशविनायक आंबेकर यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १०३ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे
आरोपी नरेश विनायक आंबेकर याने मंगळवारी दिवसभर सोबतच दारू प्राशन केली. त्यानंतर पुन्हा हरिचंद्रतांड्याजवळ दारू प्राषण केली आणि तेथेच दगडाने ठेचून खून केला. घटनास्थळी गुरुवारी वअंत्यसंस्कारासाठी मदत करीत नातेवाईक व पोलीसांवर लक्ष ठेऊन होता. पोलीसांना मात्र या प्रकरणातआरोपी हा नरेश आंबेकर हाच असल्याची शंका आल्यानंतर पकडण्यासाठी त्याला पोलीस उपनिरीक्षकमंचक फड, पो. ना. गंगाधर चिंचोरे, पो. कॉ. प्रदिप शिंदे, गणेश पवार, सुरेश गाजलवाड व मेकलवाड यांनीपरिश्रम घेतले तर पुढील तपास पोलीस निरिक्षक लक्ष्मणराव केंद्रे हे करीत आहेत.



