Uncategorized

नांदेड जिल्ह्यात पावसाचा हाहाकार पूरस्थिती शेतीचे मोठे नुकसान 

नांदेड प्रतिनिधी:- १७ ऑगस्ट २५

नांदेड जिल्ह्यात जोरदार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे आणि शेतीचे मोठे नुकसान झाले आहेअनेक नद्यांना पूर आला असूनअनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली गेल्याने वाहतूक विस्कळीत झालीआहे.

नांदेड जिल्ह्यात गेल्या २४ तासांपासून पावसाचा हाहाकार सुरू असून हजारो हेक्टर शेती पुराखाली गेलीआहेसर्वाधिक फटका किनवटहिमायतनगर आणि माहूर तालुक्याला बसला आहेनदीनाले तुडुंब भरल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहेजिल्ह्यातील नऊ तालुक्यातील २७ मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली असून फुलवळ मंडळात तब्बल १३३.२५ मि.मीपाऊस पडला आहे.

किनवट  माहूर परिसरातील पैनगंगा नदीला पूर आला असून शेतपिकांचे प्रचंड नुकसान झाले आहेउमरी तालुक्यातील मोखंडी नाल्यासह अनेक गावांत पाणी घुसले असून घरेमंदिरे आणि ग्रामपंचायतीच्या इमारती पाण्याखाली गेल्या आहेतअनेक गावातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे.

विष्णुपुरी प्रकल्प ९५ टक्के भरल्याने प्रशासनाने दरवाजे उघडून ४२ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरूकेला आहेत्यामुळे गोदावरी नदी दुथडी भरून वाहत असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहेजिल्हा नियंत्रण कक्ष सज्ज ठेवण्यात आला असून आपत्ती व्यवस्थापन विभागाचीपथके तैनात आहेतप्रशासन नागरिकांना सुरक्षित राहण्याचे आवाहन करत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button