Uncategorized

विविध मागण्यासाठी शेतकऱ्यांचा बैलगाडी मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला 

नांदेड प्रतिनिधी:- शेख मोहमद रफीक

किसान जन आंदोलन भारत चे संस्थापक सचिन कासलीवाल यांच्या नेतृत्वाखाली सोमवार दि.२३ सप्टेबररोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांच्या विविध जीवनमरणाच्या मागण्यासाठी धडक मोर्चाकाढण्यात आला यावेळी जिल्हाधिकारी यांना किसान जनआंदोलनभारतच्या वतीने विविध मागण्यांचेनिवेदन देण्यात आले यावेळी हजारोंच्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

मोर्चाची सुरूवात कॉ.डॉ.अण्णा भाऊ साठे चौकापासून हिंगोली गेट अंडरब्रिज मार्गे डॉबाबासाहेबआंबेडकर पुतळा मार्गे  छत्रपती शिवाजी महाराज पुतळा मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यातआला.दुपारी एक वाजता कॉ.अण्णा भाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन करूनमोर्चाची सुरवात करण्यात आली.

यावेळी किसान जनआंदोलन भारतचे संस्थापक अध्यक्ष सचिन कासलीवाल,मुख्य समन्वयक कॉ.गंगाधरगायकवाडबालाजी आबादार पाटील,मारोती सवंडकरअजित पाटीलभारत सूर्यवंशी,सुनीलअनंतवार,गोविंद पाटील,सूरज कौऊटकर आदींनी अण्णा भाऊ साठेना पुष्पहार घालून अभिवादन करूनशेतकरी – कामगार एकजुटीच्या गगनभेदी घोषणा देत मोर्चाची सुरवात केली.शेतकऱ्यांच्या हक्कासाठी जीवनमरणाच्या मागण्यासाठी काढण्यात आलेल्या मोर्चात हजारो शेतकरी सामील झाले होतेया मोर्चासपाठिंबा देत शकडो कामगारांनी देखील आपला सहभाग नोंदविला.

उपरोक्त मोर्चात खालील प्रमुख मागण्याचे निवेदन केंद्रीय कृषीमंत्री ना.शिवराजसिंग चव्हाण,राज्याचेकृषीमंत्री ना.धनंजय मुंडेमुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे आदींना जिल्हाधिकारी यांचे मार्फत देण्यात आले.

जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांना देखील संपूर्ण मागण्याचे निवेदन देण्यात आले.निवेदनात पीक संरक्षण कायदा करण्यात यावा , शेतकरी  पिकाच्या संरक्षणासाठी वन्यप्राण्यांचा बंदोबस्तकरावाशेतकऱ्यांना शेत जमिनीच्या मुल्यांकनाच्या किमान ५०पिक कर्ज देण्यात यावे.पिक कर्जपरतफेडीचा कालावधी १० वर्ष करावा तसेच किमान आधारभूत किंमतीवरील सोयाबीन खरेदी केंद्र तातडीनेकार्यान्वित करावेत  कापूस खरेदी करीता ते  आक्टोबर २०२४ पुर्वी फेडरेशन सुरु करावेतपंतप्रधान पिकविमा योजनेचा क्लेम मंजूर झाला तर क्लेम रक्कम त्याच हंगामात देण्यात यावी.शेतकऱ्यांना झिरो बॅलन्सवर बँकेत बचत खाते काढण्याचा अधिकार देण्यात यावा.

शेतकऱ्यांचे बँकेतील बचत खाते होल्ड करु नये.ऊस लागवड  तोडणी प्रोग्राम ऑनलाइन करून उसकारखान्याची दादागिरी  एकाधिकारशाही संपवाफळेभाजीपाला बाजारातील एकसारख्या गुणवत्तेच्यामालाचा भाव फरकवजन वजावटकमीशन रद्द करा आणि शेतमाल विक्री नंतर पैसे (पट्टीत्याचदिवशी देण्याची कारवाई करा.पेस्टीसाइड (कीटकनाशके केमिकल मधील ५००पर्यंतची नफाखोरीसंपवा आणि शेतकऱ्यांची लूट करणाऱ्या राष्ट्रीय  बहुराष्ट्रीय कंपण्यांना शील ठोका.आदी शेतकरीहिताच्या मागण्यासह कामगारांच्या मागण्याचे वेगळे निवेदन जिल्हाधिकारीमनपा आयुक्त  नांदेडतहसीलदार यांना देण्यात आले

 ते  सप्टेंबर रोजी नांदेड  शहरात अतिवृष्टी होऊन नदीकाठावरील  सखल भागात राहणाऱ्या नागरिकांचेमोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहेत्या सर्वांना सरसगट सानुग्रह अनुदान देण्यात यावेतसेच सीटूकामगार संघटनेच्या कामगारांनी मनपाच्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांकडे गृह पाहणी करून पंचनामे करण्यातयावेत यासाठी अर्ज सादर केले आहेतत्या सर्वांच्या घरी जाऊन पाहणी करावी  पंचनामे करून नुकसानभरपाई देण्यात यावीसर्व अर्जदारांचे अर्ज स्वीकारावेत तसेच तलाठी  वसुलीलिपिक हे पीडिताच्या घरी जाता दलाला मार्फत व्हाट्सअपवर नावे मागवून बोगस पूरग्रस्तांची यादी तयार करीत आहेतत्याचे सायबरशाखे मार्फत व्हाट्सअप चॅट तपासून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी.

आदी मागण्या करण्यात आल्या आहेतया मोर्चात सचिन कासलीवालकॉ.विजय गाभनेकॉगंगाधरगायकवाडबालाजी आबादर पाटीलकॉ.उज्वला पडलवारमारोती सवंडकर ,अजित पाटील,दिलीप कंधारेआदींनी मनोगतपर मोर्चेकऱ्यांना संबोधित केले.

मोर्चात मोठ्या संख्येने शेतकरी सामील झाले होते.मोर्चा यशस्वी करण्यासाठी सूरज कौऊटकर,श्यामसरोदेजयराज गायकवाड,आदींनी परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button