ऊसतोड कामगारांची मुलं शाळांऐवजी उसाच्या फडात; केंद्रप्रमुखांनी केले शाळेत दाखल

मुखेड प्रतिनिधी:-
कोरोनाच्या संकटात विद्यार्थ्यांचं मोठं नुकसान झाल पण उसतोड कामगारांच्या मुलांसाठी हे दरवर्षीचं अवस्था आहे
हि अवस्था केवळ या टोळीतील विद्यार्थ्यांचीच नाही. तर महाराष्ट्रात जवळपास पंधरा लाख ऊस तोडकामगार आहेत. ऊस तोडीसाठी हि कुटुंबे साखर पट्यात दरवर्षी स्थलांतरित होत असतात. स्थलांतरित झाल्यांनंतर त्यांच्या मुळगावी फक्त वयस्कर लोक उरतात. आई वडील काम करत असताना लहानअसलेल्या मुलांची जबाबदारी पेलण्यासाठी तसेच शेळी व इतर पाळीव जनावरांची देखभाल करण्यासाठीया मुलाना आईवडील सोबत आणत्तात. यामुळे हि मुले किमान पाच ते सहा महिने शाळे पासून बाहेर असतात.
शेतकरी व मजुरी करणारे कुटुंब आपल्या उदरनिर्वाहसाठी स्थलांतरित होतात.अशी कुटुंब नांदेड लगत बोरगाव,रहाटी,जैतापूर,नाळेश्वर ,सोमेश्वर ,वाघी,पिपळगाव, वाजेगांव असलेल्या विटभट्टीवर व या भागात ऊस लागवड मोठ्या प्रमाणात असल्याने ऊसतोडी साठी येतात वाजेगाव केंद्रातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा त्रिकुट शाळेस केंद्रप्रमुख व्यंकट गंदपवाड भेट दिलीअसता शाळेस लागून ऊसतोडणी चालू होती .यात काहि विद्यार्थी तेथिल ट्रकटरवर खेळताना दिसली असताया फडास प्रत्यक्ष भेट देऊन पालकांना शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले व जवळच असलेल्या त्रिकुट शाळेतया मुलांना सोबत नेऊन शाळेत दाखल केले.यात विशाल थोटरमोरे इयत्ता ४थी,श्रीचंदरोडे १ली,पिराजीनामेकर इयत्ता १ली,नयना जगडोंगरे इयत्ता री,पुनम गायकवाड इयत्ता ५ वी मध्ये दाखल करण्यात आलीयाबदल गटशिक्षणाधिकारी नागराज बनसोडे, शिक्षणाधिकारी मनपा तथा शिक्षणविस्तार अधिकारीव्यंकटेश चौधरी यांचे मार्गदर्शन लाभले.



