सातजन्माच्या गाठी अल्पकाळातच का सैल होतेय? नांदेडमध्ये वर्षभरात ३३० हून अधिक घटस्फोट; संवाद हरवतोय,शंका वाढतेय

नांदेड – मोबाईलचा अतिरेक, संवादाचा अभाव, करिअरचा ताण, एकमेकांविषयी समजून न घेण्याचीवृत्ती… यामुळे नांदेडमध्ये सातजन्माच्या गाठी अल्पकाळातच सैल होऊ लागली आहे. २०२४ मध्ये नांदेडजिल्हा कौटुंबिक न्यायालयात तब्बल ३३१ घटस्फोटाचे खटले दाखल झाले, तर यंदाच्या केवळ पाचमहिन्यांतच १६४ नव्या तक्रारी समोर आल्या आहेत.

तुटलेली माणुसकीची नाळ, सोशल मीडियामधील आभासी जग, लॉक असलेले फोन, अपत्यावरूनहोणारे वाद, सासुरवाशीण संघर्ष, आर्थिक असमतोल – ही आधुनिक घटस्फोटाची नवी कारणं ठरतआहेत. ७० ते ८० टक्के प्रकरणांमध्ये म्युच्युअल सेपरेशन होत असून, कोर्टाऐवजी सामोपचारातून प्रश्नसोडवले जात आहेत.

घटस्फोट आता फक्त वादामुळेच नव्हे, तर संवादाच्या अनुपस्थितीतही होतोय. “नात्यांमध्ये समजून घेणं, वेळ देणं आणि संवाद ठेवणं अत्यंत गरजेचं झालं आहे,” असं मत अॅड. प्रसाद रानवळकर यांनी व्यक्तकेलं.
घर तुटू नये म्हणून संवादाचं बंधन मजबूत ठेवा – नाहीतर ‘सातजन्माची’ गाठ एका क्लिकवर तुटू शकते!



