१८ वर्षांनंतर माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमिलन सोहळा

मुखेड प्रतिनिधी:- ३० ऑक्टोंबर
मुखेड तालुक्यातील मौजे चांडोळा येथील महात्मा गांधी विद्यालयातील सन २००६–०७ या वषार्तीलविद्यार्थी व विद्यार्थिनीचा स्नेहमिलन सोहळा महात्मा गांधी विद्यालयात दि. २६ आक्टोंबर रोज रविवारी मोठ्या उत्साहात सामाजिक उपक्रमांने संपन्न झाला. याप्रसंगी शाळेत वृक्षारोपण व होतकरू, गरजू, गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणीक साहित्य, स्कूल बॅग देवून मदतीचा हात देण्यात आला. तसेच एम.बी.बी. एस.चे शिक्षण घेत असलेल्या गावातील ०३ विद्यार्थ्यांना ४० हजार रूपयांची आर्थिक मदत करण्यात आली. स्नेह मेळाव्याप्रसंगी जमलेल्या सर्व माजी विद्यार्थ्यांनी भविष्यात आपण प्रत्येक सामाजिक कार्यातसहभाग घेऊन लोक कल्याणकारी कामे करू असा संकल्प केला.
तालुक्यातील मौजे चांडोळा येथील महात्मा गांधी विद्यालयातील सन २००६– ०७ या वषार्तील विद्यार्थ्यांचा स्नेह मिलन सोहळा महात्मा गांधी विद्यालयात दि.२६ आक्टोंबर रोजी आयोजीत करण्यात आला होता. सदरील स्नेह मिलन मेळावा सामाजिक बांधिलकी जपत उत्सहात साजरा करण्यात आला. तब्बल १८ वर्षांनी भेटत असलेल्या मित्र व मैत्रिणींनी आपला परिचय करून दिला यानंतर महात्मा गांधीविद्यालय या शाळेच्या परिसरात माजी विद्यार्थ्यांच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले. तसेच शाळेतील सर्वसामान्य गोरगरीब, गरजू होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणीक साहित्य व स्कूल बॅग देण्यात आले. त्याचबरोबर एम.बी.बी. एस.चे, शिक्षण घेत असलेल्या गावातील ०३ विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी ४० हजार रुपयाची आर्थिक मदतही करण्यात आली. माहात्मा गांधी विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांच्या यासामाजिक उपक्रमांचे सर्वत्र कौतुक होत आहे. स्नेह मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी श्री. कांबळे होते तर प्रमुखअतिथी म्हणुन मुंगडे, चंदावाड, शाळेचे मुख्याध्यापक भारत शिगंणवाड, शिक्षक बी. जी.सर, कोंडलवाडे, टाकळे, चोडींकर, केंद्रे, मुग टकर यांची प्रमुख उपस्थिती होती. महात्मा गांधी विद्यालयात शिक्षण घेतलेलेअनेक विद्यार्थी शासकीय सेवेत सेवा देत आहेत, औद्योगिक क्षेत्रातही नाव लौकिक करीत आहेत तरअनेक विद्यार्थी व्यवसायामध्ये आपल्या नावाचा ठसा उमटविला आहे. या कार्यक्रमासाठी २००६– ०७ वषार्तील इयत्ता दहाव्या वगार्तील सर्व मित्र–मैत्रिनिंनी उपस्थिती लावली होती. सर्व कामे बाजूला ठेवूनएक दिवस मित्रांसाठी या हेतूने सर्वजण संबंध दिवस बालपणात रमलेले दिसून आले. यानंतर शेवटच्यासत्रात सर्व उपस्थित माजी विद्यार्थी व विद्यार्थिनींनी पुढील काळात आपल्या मध्ये समन्वय ठेवून एकत्रितसामाजिक कार्य करून समाजात एक आदर्श निर्माण करण्यासाठी संकल्प केला आहे.



