शिधापत्रिकारधाकांनी ई-केवाईसी करून घ्यावे अन्यथा अन्नधान्य योजनेचा लाभ सदस्याना मिळणार नाही :- तहसिलदार राजेश जाधव

मुखेड/प्रतिनिधी:-
शासनाच्या अनुदानित अन्नधान्य योजनेचा लाभ मिळविण्यासाठी राशनकार्ड धारकांनी सर्व सदस्यांची ई–केवाईसी करणे बंधनकारक आहे. रेशनकार्ड ई–केवाईसी न केल्यास अन्नधान्य योजनेचा लाभ मिळणेबंद होणार आहे. अद्यापही तालुक्यातील अंत्योदय व प्राधान्य कुटूंब योजनेतील एकूण २१४८४७ लाभार्थ्यांपैकी ६८५६८ लाभार्थ्यांची ई–केवायसी होणे शील्लक आहे. त्यामुळे या सर्व राशनकार्ड धारकांनी ई –केवाईसी दि. ३१ मार्च पर्यंत तात्काळ करुन घ्यावी, असे आवाहन तहसिलदार राजेश जाधव व नायब तहसिलदार तथा पुरवठा अधिकारी निलेश रोहनकर यांनी केले आहे.
राज्यातील नागरीकांना उदरनिर्वाह करण्यासाठी शासनाच्या वतीने राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेंतर्गतअनुदानित अन्नधान्य देण्यात येत असते. या योजनेमध्ये अंत्योदय व प्राधान्य कुटूंब योजनेतील राशन कार्डधारक कुटूंबाचा समावेश आहे. या अंत्योदय व प्राधान्य गट योजनेतील शिधापत्रिकेमध्ये समाविष्ठ असलेल्या सर्व सदस्यांची ई– केवाईसी करणे बंधनकारक आहे. केवायसी न केल्यास अन्नधान्य योजनेचा लाभ त्या सदस्याला मिळणार नाही. त्यामुळे सर्व शिधापत्रिकाधारक सदस्यांनी दि.३१ मार्च २०२५ पर्यंत आपल्या शिधापत्रिकेतील सर्व सदस्यांचे मुळ राशनकार्ड व आधारकार्डच्या झेरॉक्स प्रतिसह रास्तभाव दुकानात समक्ष उपस्थित राहून त्यांच्याकडे असलेल्या ई–पॉस मशिनवर सर्व सदस्यांनी बोटाचे ठसे देवून आपलीई–केवाईसी पूर्ण करुन घ्यावी.
तालुक्यात अंत्योदय व प्राधान्य कुटूंब योजनेतील एकूण २१४८४७ लाभार्थी असून आज रोजी पर्यंत ८५०७१ लाभार्थ्यांची ई–केवायसी पूर्ण झालेली आहे. तर अद्यापही ६८५६८ लाभार्थ्यांची ई–केवाईसी होणे शिल्लक आहे. केवाईसी न केलेल्या राशनकार्ड धारकांना अन्नधान्य मिळणे बंद होणार आहे. त्यामुळे तालुक्यातील सर्व कार्डधारकांनी आपली ई केवाईसी शासनाने दिलेल्या मुदतीच्या आत करुन घ्यावी व होणारी गैरसोय टाळावी, असे आवाहन तहसिलदार राजेश जाधव आणि नायब तहसिलदार तथा पुरवठा अधिकारी निलेश रोहनकर यांनी केले आहे.



