फोटोसेशनपेक्षा नागरिकांना प्रत्यक्ष मदत करा – राहुल भाऊ नावंदे

▫️अतिवृष्टीने मुखेड तालुका जलमय; बसव फाउंडेशनच्या माध्यमातून समाजहिताचे कार्य
मुखेड प्रतिनिधी:- ०१ सप्टेंबर
फोटोसेशनपेक्षा नागरिकांना प्रत्यक्ष मदत करा अशी खणखणीत भूमिका बसव फाउंडेशनचे संस्थापकअध्यक्ष राहुल भाऊ नावंदे यांनी पत्रकार परिषदेत मांडली आहे.
मुखेड तालुक्यात अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूरपरिस्थितीमुळे अनेक नागरिकांचे घरे उद्ध्वस्त झालीअसून जनजीवन विस्कळीत झाले आहे. शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान झाले, जनावरे दगावली, तरमुखेड शहरासह तालुक्यातील मोठ्या प्रमाणातील मालमत्ता पावसामुळे बाधित झाली आहे. या गंभीरपरिस्थितीत नागरिकांना तातडीची मदत मिळणे अपेक्षित असताना, अनेक नेते व लोकप्रतिनिधी फक्तपाहणी दौरे करून, छायाचित्र काढण्यात गुंतले आहेत.
यावर बसव फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष राहुल भाऊ नावंदे यांनी तीव्र शब्दांत प्रतिक्रिया नोंदवली. पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, *“सध्या नागरिकांवर संकट कोसळले असताना नेत्यांनी बांधावर उभे राहून किंवा दौरे करून फोटो काढण्या पेक्षा प्रत्यक्ष मदतीला धावून यावे. शासनाचीमदत मिळेपर्यंत नागरिक उपाशी आहेत, त्यांना तातडीची मदत पोहोचवणे ही लोकप्रतिनिधींची जबाबदारी आहे. सत्तेत असलेले नेते देखील फक्त फोटो काढून लोकांमध्ये दिखावा करत आहेत. पण वैयक्तिक मदत कोणाच्याही घरपोच पोहोचत नाही, ही वस्तुस्थिती आहे.”*
याच पार्श्वभूमीवर राहुल भाऊ नावंदे यांनी स्वतः पुढाकार घेत समाजकारणाचा आदर्श ठेवला. त्यांच्याघरी अलीकडेच दुःखद घटना घडली – त्यांचे आजोबा लिंगैक्य मारोती शंकर नावंदे यांचे वयाच्या १०१व्या वर्षी, दिनांक १५ ऑगस्ट रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. या कारणास्तव त्यांनी यावर्षी दहीहंडीउत्सव साजरा न करता समाजहितासाठी कार्य करण्याचा निर्णय घेतला.
दिनांक ३० ऑगस्ट रोजी कंधार तालुक्यातील दिग्रस गावात छोट्या कार्यक्रमात त्यांनी समाजकारणाला प्राधान्य देत नागरिकांच्या सेवेसाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले. या वेळी श्रीपादेश्र्वर शिवाचार्यमहाराज गीरगावकर यांच्या हस्ते रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले. ही रुग्णवाहिका त्यांच्याआजोबा लिंगैक्य मारोती शंकर नावंदे यांच्या स्मरणार्थ मतदारसंघातील जनतेच्या सेवेसाठी उपलब्धकरून देण्यात आली.
या उपक्रमातून नागरिकांच्या सेवेसाठी तत्पर राहण्याचा आदर्श राहुल भाऊ नावंदे यांनी दाखवला आहे. मदतीसाठी शब्दांपेक्षा कृती महत्त्वाची असते, हे त्यांनी आपल्या कार्यातून अधोरेखित केले आहे.
दौर्यांवरून नेत्यांवर टीका
पूरपरिस्थितीत अनेक नेते व लोकप्रतिनिधी दौरे करताना दिसत आहेत. मात्र हे दौरे फक्त छायाचित्रांपुरतेमर्यादित असून, नागरिकांना मदतीचा लाभ होताना दिसत नाही. यावर बसव फाउंडेशनचे संस्थापकअध्यक्ष राहुल भाऊ नावंदे यांनी तीव्र शब्दांत प्रतिक्रिया व्यक्त केली.ते म्हणाले, “मी विधानसभा निवडणूक लढलो, परंतु पराभव झाला. आज आम्ही सत्तेत नाही, आमच्याकडेसाधनसामग्री नाही, त्यामुळे आम्ही दौरे केले नाहीत. मुळात मला फक्त फोटो काढून प्रसिद्धी करायचीनाही. पण सत्तेत असलेले लोकप्रतिनिधी मात्र दौरे करूनही एक रुपयाचीही मदत नागरिकांना पोहोचवूशकलेले नाहीत. ही अतिशय लाजिरवाणी बाब आहे.”



