राजकीय

दुबार पेरणीचे संकट,बोगस बी-बियाणे विक्रेत्यांवर गुन्हे दाखल करा!

मुखेड : प्रतिनिधी:- ११ जुलै २५

 तालुक्यासह नांदेड जिल्ह्यात बोगस बीबियाण्यांमुळे शेतकऱ्यांना पुन्हा एकदा दुबार पेरणीचेसंकट ओढावले असूनया बोगस कंपन्यांवर तात्काळ गुन्हे दाखल करावेतअन्यथा तहसीलकार्यालयावर तीव्र आंदोलन छेडले जाईलअसा इशारा  भाछावा  संघटनेच्या वतीने  निवेदन दि ११ जुलै रोजी जिल्हाधिकारी नांदेड यांना देण्यात आले.

बोगस बीबियाण्यांमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले असूनत्यातच यंदा हवामानाचाअनियमितपणा आणि अद्याप  मिळालेला पीक विमा यामुळे शेतकरी अक्षरशः अडचणीत सापडलाआहेजिल्ह्यातील काही कृषी अधिकाऱ्यांच्या संगनमताने बोगस बीबियाणे  खते खुलेआम विकलेजात आहेतत्यामुळे केवळ बोगस कंपन्यांवर नव्हे तर त्यांच्या पाठीशी असणाऱ्या कृषी अधिकाऱ्यांवरहीगुन्हे दाखल करण्यात यावेतअशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे.

जर प्रशासनाने तात्काळ पावले उचलली नाहीततर शेतकऱ्यांना सोबत घेऊन तहसील कार्यालयमुखेडयेथे तीव्र आंदोलन करण्यात येईलअसा इशाराही यावेळी देण्यात आला.

या निवेदनावर अखिल भारतीय छावा संघटना तालुकाध्यक्ष गिरीधर पाटील शिंदे केरुरकरयुवक काँग्रेसतालुका सचिव तुकाराम पाटील सुडकेहनुमंत पाटील हसनाळकरबालाजी पाटील शिंदे यांच्या सह्याआहेत.

शेतकऱ्यांच्या भवितव्यासाठी प्रशासनाने त्वरेने कारवाई करावीहीच या आंदोलनाची मुख्य मागणी होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button