शेतकऱ्यांचा ७/१२ कोरा झालाच पाहिजे; माजलगावात दोन तास चक्काजाम आंदोलन

▫️शेतकरी कर्जमाफीसाठी मेंढ पाळा सहित चक्काजाम आंदोलन
माजलगाव :- २५ जुलै २५
प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष बच्चुभाऊ कडू यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र मध्ये चक्काजाम आंदोलन करण्यात आले. माजलगाव तालुक्यातील वसंतराव नाईक चौक परभणी फाटा येथे साकळी ११.३० वाजता चक्काजाम आंदोलनास सुरवात करण्यात आले हे आंदोलन दोन तास चालू होते या आंदोलनात शेतकरी तसेच दिंव्याग बाधव, मेंढ्या सहित मेंढपाळ मालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. गेल्या काही महिन्या पासून प्रहार चे संस्थापक अध्यक्ष मा. बच्चुभाऊ कडू यांनी शेतकरी सातबारा कोरा करण्यासाठी कर्जमाफीची मागणी शासनाकडे केली आहे.

त्यासाठी त्यांनी आमरण उपोषणही केले नंतरपदयात्रा काढली आता कर्जमाफी बाबत प्रत्येकाने आवाज उठवणे गरजेचे असल्याने आंदोलनाच्या पुढील टप्पा म्हणून २४ जुलै रोजी राज्यभर चक्काजाम आंदोलन करण्यात आले आंदोलनात कोणत्याही पक्षाचा झेंडा नाही केवळ शेतकरी, दिव्यांग, मेढपाळ, मछीमार, कर्मचारी यांच्या विविध प्रश्नासाठी व एकत्र येऊन शासनाकडे कर्जमाफीची मागणी जोर कस पणे मांडण्यासाठी दोन तास चक्काजाम आंदोलन केले आहे. या आंदोलना मध्ये शेतकरी संघटनेचे नेते भाई गांगभिषण थावरे, शेतकरी कामगार पक्षाचे नेते एडवोकेट भाई नारायण गोले पाटील, काँग्रेसचे तालुकाप्रमुख नारायण होके पाटील, आझाद क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष राजेश घोडे, मौलाना आझाद युवा मंचचे जिल्हाध्यक्ष नुमान अली चाऊस, शेतकरी क्रांती सेनेचे योगेश कानडे, वीर शंभू संघटनेचे गणेश शिंदे , आझाद क्रांतीचे तालुकाध्यक्ष अशोक ढगे व पदाधिकारी तसेच आजी माजी सैनिक संघटनांनी मा.वसंतराव नाईक चौक परभणी फाटा माजलगाव येथे येऊन चक्काजाम आंदोलनात सहभागी होऊन जाहीर पाठिंबा दिला हे आंदोलन माजलगाव प्रहार जनशक्तीचे तालुका अध्यक्ष गोपाळ पैजणे, नितीन कांबळे, भारत डोंगरे हरिचंद्र जाधवविजय जोगडे अशोक अर्जुन लक्ष्मण गरड, विकास जगताप,विलास लवाळे, श्रीराम कोरडे, युवराजराठोड, महादेव डाके, पांडुरंग कुकडे, गणेश नागणे, अनेक शेतकरी व दिव्यांग बांधव पदाधिकारीउपस्थित होते.




