राजकीय

  • ठाकरे सेनेच्या मुखेड विधानसभा प्रमुखपदी मन्मथअप्पा खंकरे यांची निवड

    ∆ खंकरे यांची निष्ठावंत शिवसैनिक म्हणून तालुक्यात ओळख मुखेड -(ता. प्रतिनिधी) २६ जून मुखेड तालुक्यात अनेक वर्षापासून शिवसेना पक्षाचे निष्ठावंतपणे…

    Read More »
  • मुखेड तालुक्यातील १२१ ग्रामपंचायत साठी सरपंच पदांचे आरक्षण जाहीर

    मुखेड प्रतिनिधी :- २६ जून २५ मुंबई ग्रामपंचायत सरपंच निवडणूक नियम १९६४ मधील नियम २ (अ) २ अन्वये शासन ग्रामीण विकासविभागाने निर्गमित केलेल्या आदेशानुसार व जिल्हाधिकारी नांदेड यांच्या पत्रानुसार मुखेड तालुक्यातील१२१ ग्रामपंचायतींसाठी २०२५ ते २०३० या कालावधीतील पंचवार्षिक निवडणुकीसाठी सरपंच पदांचेआरक्षण निश्चित करण्यात आले आहे. आरक्षण प्रक्रिया पारदर्शक व नियमबद्ध पद्धतीने पारपाडण्यासाठी दि. १ जुलै २०२५ रोजी दुपारी ३ वाजता तहसील कार्यालय, मुखेड येथे आरक्षण सोडतकाढण्यात येणार आहे. यावेळी उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, निवडणूक अधिकारी, व संबंधितविभागीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत. मुखेड तालुक्यातील १२१ ग्रामपंचायतींपैकी अनुसूचित जातींसाठी १५, अनुसूचित जमातींसाठी ४, इतरमागासवर्गीयांसाठी ३५ व खुल्या प्रवर्गासाठी ६७ सरपंच पदे आरक्षित करण्यात आली आहेत. त्यापैकीमहिलांसाठी अनुक्रमे ७, २, १८ व २९ जागा आरक्षित आहेत. आरक्षण प्रक्रियेबाबत ग्रामस्थांनी मोठ्याप्रमाणावर उपस्थित राहावे, असे आवाहन तहसीलदार राजेश जाधव यांनी केले आहे

    Read More »
  • नांदेड मधील ग्रामपंचायत सरपंच पदाचे आरक्षण सोडत बैठक १ जुलै रोजी

    नांदेड दि. २४ जून २५ नांदेड तालुक्यातील ग्रामपंचायत सरपंच पदाचे वर्ष २०२५ ते २०३० साठी आरक्षण सोडत १ जुलै २०२५ रोजी सकाळी १० वा. तहसिल कार्यालय नांदेड (उपविभागीय अधिकारी नांदेडयांच्या बैठक कक्षात दुसरा मजला) येथे काढण्यात येणार आहे. सरपंच पदाचे आरक्षणात नांदेडतालुक्यात एकुण राखीव ७३ पदांपैकी ३७ महिलांसाठी राखीव पदे आहेत. सर्व संबंधीतानी तसेच माजीजिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सदस्य यांनी या सोडतीसउपस्थित रहावे, असे आवाहन तहसिलदार नांदेड यांनी केले आहे  नांदेड जिल्हाधिकारी यांची अधिसूचना २३ जून २०२५ नुसार नांदेड तालुक्यातील बिगर अनुसूचित क्षेत्रातील ग्रामपंचायतीसाठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकाचा मागास प्रवर्ग आणि स्त्रियायांच्यासाठी राखून ठेवावयाची सरपंचाची पदे मुंबई ग्रामपंचायत (सरपंच व उपसरपंच) निवडणूक नियम१९६४ च्या नियम २अ चे पोटनियम ३ व ४ अन्वये जिल्हाधिकारी नांदेड यांनी पुढील तपशिला नुसार अधिसूचीत करुन दिले आहे. सरपंच पदाचे आरक्षण अनुसूचित जातीसाठी एकुण राखीव पद १८ त्यापैकी ५० टक्के महिलांसाठी राखीव ९, अनुसूचित जमाती १ पैकी महिलासाठी १, नागरिकांचा मागास प्रवर्गएकुण राखीव पद २० पैकी महिलांसाठी १०, खुला प्रवर्ग एकुण राखीव पद ३४ पैकी ५० टक्के महिलांसाठी १७ राखीव ठेवण्यात आली आहेत. आरक्षण हे सन २०२५ ते २०३० मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणूकांसाठी अमलात राहील. सदरप्रवर्गाच्या सरपंच पदासाठी सोडत पद्धतीने तहसिल कार्यालय नांदेड (उपविभागीय अधिकारी नांदेड यांचे बैठक कक्ष, दुसरा मजला) येथे मंगळवार १ जुलै २०२५ रोजी सकाळी १० वा. करण्यात येईल. सर्वसंबंधीतानी असेही आवाहन तहसिलदार संजय वारकड यांनी केले आहे.

    Read More »
  • बच्चू कडू यांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित; 2 ऑक्टोबरपर्यंत मागण्या मान्य न झाल्यास मंत्रालयातशिरण्याचा इशारा

    ▫️फडणवीसांनी एक दिवसाचा उपवास करावा – नयना कडू ▫️बावनकुळेंचे उपोषण मागे घेण्याचे आवाहन धुडकावले  अमरावती:-  शेतकरी कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी गत ७ दिवसांपासून अन्नत्याग उपोषण करणाऱ्या बच्चू कडू यांनी शनिवारी आपले उपोषण स्थगित करण्याची घोषणा केली. या प्रकरणी त्यांनी सरकारला आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी २ ऑक्टोबरप र्यंतची मुदत नाही तर २ ऑक्टोबर रोजी आम्ही थेट मंत्रालयात शिरू, असे ते या प्रकरणी सरकारला इशारा देताना म्हणालेत. शेतकरी कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी गत ७ दिवसांपासून अन्नत्याग उपोषण करणाऱ्या बच्चू कडूयांनी आता परवापासून म्हणजे १६ तारखेपासून जलत्याग करण्याचा इशारा दिला आहे. सरकारने कर्जमाफीच्या मुद्यावर वेळीच निर्णय घेण्याची गरज होती. आता या प्रकरणी सरकार एक समिती नेमणार आहे. या समितीचा अहवाल आल्यानंतर कर्जमाफी केली जाणार असल्याची माहिती आहे. पण सरकारने आज निर्णय घेतला नाही तर मी १६ जूनपासून जलत्याग उपोषण करेल, असे ते म्हणालेत. प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू गत ७ दिवसांपासून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह विविद मागण्यांसाठी अन्नत्याग उपोषण करत आहेत. या उपोषणामुळे त्यांची प्रकृती खालावली असून, डॉक्टरांनी त्यांना रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला दिला आहे. पण त्यानंतरही बच्चू कडू यांनी आपले उपोषण नेटानेपुढे नेण्याचा संकल्प व्यक्त केला आहे. ते शनिवारी पत्रकारांशी बोलताना म्हणाले, खरे तर लवकरनिर्णय व्हायला हवा होता. सरकारने आता यासंबंधी एक उच्चस्तरीय समिती नेमण्याचा निर्णय घेतलाआहे. या समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर कर्जमाफीचा निर्णय घेतला जाणार आहे. पण या समितीची अहवाल केव्हा येणार? कोणत्या तारखेला कर्जमाफीची घोषणा करणार? हे काहीहीस्पष्ट नाही. या मुद्यावर मी कार्यकर्त्यांशी चर्चा करणार आहे. या बैठकीत एखादा निर्णय होईपर्यंत कार्यकर्त्यांनी संयम राखावा. कोणतेही अनुचित कृत्य करू नये. पण माझी मानसिकता आहे की, १६ तारखेपासून पाणीही सोडून द्यावे, असे बच्चू कडू म्हणालेत.

    Read More »
  • नांदेड जिल्हा परिषद निवडणुकीत राहणार ६५ गट

    मुखेड तालुक्यात सर्वाधिक सात गट तर किनवट, हदगाव, लोहा आणि कंधार तालुक्यात प्रत्येकी सहा गटांचा समावेश, २०११ च्या जनगणनेनुसार होणार निवडणूक नांदेड प्रतिनिधी:-  १३ जून २५ राज्यातील ३२ जिल्हा परिषदेच्यासार्वत्रिक निवडणूक प्रक्रियेला प्रारंभ झाला आहे. यामध्ये नांदेड जिल्ह्यात ६५ गटांमध्ये निवडणूक होणार असून या प्रत्येक गटामध्ये दोन पंचायत समितीचे असे एकूण १३० गण निवडले जाणार आहेत. नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक ७ गट मुखेड तालुक्यात राहतील तर किनवट, हदगाव, लोहा आणि कंधार यातालुक्यात प्रत्येकी ६ गटांचा समावेश करण्यात आला आहे. या गटांची रचना आता करण्यासाठी समितीची स्थापना करण्यात येणार आहे. जिल्ह्यात आता स्थानिकस्वराज्य संस्थांच्या निवडणूक प्रक्रियेला वेग येणार आहे. प्रशासनाकडून होणाऱ्या या प्रभाग रचना, वॉर्डरचना, गट आणि गण रचनेकडे आता इच्छुकांचे लक्ष लागले आहे. २०११ च्या जनगणनेनुसार हीनिवडणूक होणार आहे. यामध्ये नांदेड जिल्ह्याची ग्रामीण लोकसंख्या ही २४ लाख १६ हजार १८४ इतकी आहे. त्यामध्ये अनुसूचित जातीचीलोकसंख्या ही ४ लाख ७७ हजार २३ आणि अनुसूचित जमातीची लोकसंख्या २ लाख ४० हजार २७४इतकी आहे. या लोकसंख्येवर आधारित गट आणि गण रचना तयार करून त्याबाबतचे आरक्षणही निश्चित केले जाणार आहे. जिल्हा परिषद क्षेत्राचे निवडणूक विभागामध्ये आणि पंचायत समीक्षक समिती क्षेत्राचे निर्वाचन गणांमध्ये विभाजन करणे, त्यांच्या सीमा निश्चित करून त्यांचे प्रारूप तयार करणे याची जबाबदारी जिल्हाधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांनी प्राधिकृत केलेला तहसीलदार अशा अधिकाऱ्याकडे ही जबाबदारी राहणारआहे. निर्वाचक गणरचनेचे प्रारूप जिल्हाधिकारी प्रसिद्ध करतील. निवडणूक विभाग आणि निर्वाचक गणरचनेच्या प्रारूपावरील हरकती आणि सूचना जिल्हाधिकारी किंवा तहसीलदार दर्जापेक्षा कमी नाही असेअधिकारी स्वीकारतील. जिल्हा परिषद क्षेत्राचे निवडणूक विभाग आणि पंचायत समिती क्षेत्राचे निर्वाचनया संबंधी प्रारूप प्रसिद्धीनंतर प्राप्त झालेल्या हरकती आणि सूचनावर सुनावणी घेऊन राज्य निवडणूकआयोगाने किंवा त्यांनी प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्याने मान्यता दिल्यानंतर जिल्हा परिषद क्षेत्राचेनिवडणूक विभाग आणि पंचायत समिती क्षेत्राचे निर्वाचक गण अंतिम करण्याची जबाबदारी विभागीय आयुक्तांकडे राहणार आहे. त्याचवेळी जिल्हा परिषद निवडणूक विभाग आणि पंचायत समिती निर्वाचकगणाची अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध जिल्हाधिकारी प्रसिद्ध करतील. हे सर्व आदेश राज्याचे प्रधान सचिवएकनाथ डवले यांनी दिले आहेत.

    Read More »
  • प्रभाग रचनेची प्रक्रिया दोन दिवसात जाहीर होण्याची शक्यता

    पुणे :- ०८ जून २५ सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकी संदर्भात चार आठवड्यांत अधिसूचना जारीकरण्याच्या दिलेल्या आदेशानुसार राज्य निवडणूक आयोगाने हालचाली सुरू केल्या आहेत. प्रभागरचनेसाठी राज्य सरकारला सूचनाही दिल्या आहेत. त्यानुसार येत्या दोन दिवसात महापालिकेची प्रभागरचनेची प्रक्रिया जाहीर होण्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयाने पुढील चार महिन्यात निवडणुका घेण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत. त्यानुसार, राज्य शासनाने प्रभाग रचनेचा कार्यक्रम ठरवला असून, त्यासंबंधीचे आदेश लवकरच जाहीर केले जातील. महायुती सरकारने यंदाही चार सदस्यीय प्रभाग पद्धती लागू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. २०१७च्या महापालिका निवडणुकीतही हीच प्रणाली वापरण्यात आली होती. आता निवडणूक आयोगाने प्रभाग रचना पूर्ण करण्याची जबाबदारी पुन्हा राज्य सरकारवर सोपवली आहे. त्यानुसार प्रभाग रचनेचीप्रक्रिया येत्या दोन दिवसांत जाहीर होण्याची शक्यता आहे. पावसाळ्याचा कालावधी, महापालिका–जिल्हा परिषद–पंचायत समितीच्या एकत्रित निवडणुकाघेण्यासाठीची यंत्रणा या साऱ्यांचा विचार करावा लागणार आहे. त्यासाठी न्यायालयाकडे काहीकालावधीची मागणी केली जाण्याची शक्यता आहे. राज्य शासनाने चार सदस्यीय प्रभाग रचनेचे नवीनआदेश दिले, तर त्यासाठी रचना, आरक्षण, मतदार यादी तयार करणे यासाठी तीन महिन्यांचा अवधीलागणार आहे. जूनमध्ये आदेश दिले तर तेव्हापासून ऑक्टोबर पर्यंत ही प्रक्रिया होईल. त्यामुळे पुढील 45 दिवसांत म्हणजे ऑक्टोबर अखेर किंवा नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात मतदान होऊ शकते.

    Read More »
  • एसएफआयचे २५ वे नांदेड जिल्हा अधिवेशन मुखेड येथे संपन्न

    जिल्हा अध्यक्ष विजय लोहबंदे तर जिल्हा सचिव म्हणून मीना आरसे यांची निवड मुखेड (ता. २९) प्रतिनिधी :  स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय)चे २५ वे नांदेड जिल्हा अधिवेशन दि.२८ मे रोजी नांदेड जिल्ह्यातील मुखेड शहरात संपन्न झाले. या वेळी शहीद भगतसिंग यांना अभिवादन करून अधिवेशनाची सुरुवात करण्यात आली.  अधिवेशनाचे उद्घाटन एसएफआयचे माजी नेते आणि डीवायएफआयचे अंकुश माचेवाड यांनी केले. अधिवेशनास एसएफआयचे राज्य सचिव रोहिदास जाधव यांनी संबोधित केले तर शेतमजूर युनियनचे नेतेकॉ. विनोद गोविंदवार यांनी अधिवेशनाला शुभेच्छा दिल्या. अधिवेशन उद्घाटन सत्राच्या अध्यक्षस्थानीविजय लोहबंदे होते तर प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन प्रफुल्ल कऊडकर यांनी केले. अधिवेशनाच्या प्रतिनिधी सत्रात संघटनेचा कार्यात्मक, संघटनात्मक, आंदोलनात्मक आणि शैक्षणिकपरिस्थितीचा आढावा घेणारा अहवाल मांडण्यात आला. त्याआधी शोक ठराव घेऊन आदरांजलीवाहण्यात आली. अधिवेशनात वेगवेगळे ठराव पारित करण्यात आले. नवीन शैक्षणिक धोरण २०२० रद्दकरा, सर्व विद्यार्थ्यांना बस प्रवास निशुल्क करा, शासकीय आयटीआयचे खाजगीकरण थांबवा, जिल्हापरिषदेच्या शाळा वाचवण्यासाठी लढा तीव्र करा, विद्यार्थिनी व महिला अत्याचार विरोधी लढा तीव्र करा, यासहित विविध ठराव एकमताने या अधिवेशनात पारित करण्यात आले. या अधिवेशनाने एसएफआयची १८ सदस्यांची नवीन जिल्हा कमिटीची निवड केली. यामध्येएसएफआयचे नवनिर्वाचित जिल्हा अध्यक्ष म्हणून विजय लोहबंदे आणि जिल्हा सचिव म्हणून मीनाआरसे यांची एकमताने निवड करण्यात आली. जिल्हा उपाध्यक्षपदी प्रफुल्ल कऊडकर व स्वप्नील बुक्तरेतसेच जिल्हा सहसचिवपदी पवन जगडमवार व विकास गायकवाड यांची निवड करण्यात आली. जिल्हाकमिटी सदस्य म्हणून अक्षय सागरे, साहेबराव सोनसाळे, नितीन सोनकांबळे, अमोल गायकवाड, सोनलपाईकराव, नेहा कऊडकर, भारत पवार, शरद खंदारे, भीमराव सोनकांबळे यांची निवड करण्यात आलीआहे. ३ जागा रिक्त ठेवण्यात आल्या आहेत. अधिवेशनात जिल्ह्यातील वेगवेगळ्या शाळा आणि महाविद्यालयातून ८६ प्रतिनिधी सहभागी झाले होते. समारोपप्रसंगी नवनिर्वाचित जिल्हा सचिव आणि अध्यक्ष यांनी मनोगत व्यक्त केले. ‘हम होंगे कामयाब‘ या गीताने अधिवेशनाचा समारोप झाला. अधिवेशन यशस्वी करण्यासाठी मुखेड तालुक्यातीलएसएफआयच्या कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली. 

    Read More »
  • उद्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बाऱ्हाळी येथे जाहीर सभा

    शेषेराव चव्हाणांसह अनेकांचा पक्षप्रवेश इतरांना आपल्या पक्षात ओढण्याचा चिखलीकर यांचा धडका सुरू मुखेड प्रतिनिधी:-  विधानसभा निवडणुकीनंतर नांदेडमध्ये महायुतीतील भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गटात पक्ष प्रवेशाची चढाओढ लागली आहे विशेष म्हणजे ही चढाओढ भाजप खासदार तथा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि राष्ट्रवादीचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्यात होत आहे उद्या दि ११ मे रोजी मुखेड तालुक्यातील बाऱ्हाळी येथे आयोजित जाहीर सभेत शिवशंकर जय साखरकारखान्याचे माजी अध्यक्ष शेषेराव चव्हाण आणि त्यांच्या अनेक सहकाऱ्यांचा  राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश होणार आहे. ही माहिती आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. त्यांनी सांगितले की, नांदेड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बळकटीसाठी मोठा संकल्प हाती घेतला आहे आणि आतापर्यंत ९०हजार सदस्यांची नोंद झाली असून हा आकडा लवकरच लाखाच्या पुढे जाईल, असा विश्वास त्यांनीव्यक्त केला. या जाहीर सभेला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, ना. इंद्रनील नाईक, रूपाली ताई चाकणकर यांच्यासह विविध स्तरांतील नेते आणि पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. शेषेराव चव्हाण यांच्यासोबत बाबुराव पवित्रे, अण्णासाहेब जहिरे, दिलीप कोटगिरे यांचाही पक्षप्रवेशहोणार आहे. या कार्यक्रमामुळे नांदेड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजकीय शक्तीला नवे बळ मिळेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. या पत्रकार परिषदेस माजी आमदार मोहन हंबर्डे, अविनाश घाटे, जिल्हाध्यक्ष दिलीपराव धर्माधिकारी, व्यंकटराव पाटील गोजे– गावकर, प्रा. उदय चव्हाण, मुक्तेश्वर…

    Read More »
  • सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचा आज नांदेड दौरा 

                                           …

    Read More »
  • मुखेड-कौठा-नांदेड महामार्गसावधान,प्रशासन गुत्तेदार लोकप्रतिनिधी झोपले आहेतकाँग्रेसचे अनोखे फलक युद्ध

    मुखेड /प्रतिनिधी दि.०९ एप्रिल २५मुखेड कौठा नांदेड राष्ट्रीय महामार्ग निकृष्ट बांधकाम चर्चेत असतानाच चालू बांधकामावर कुठेच फलक नसल्याच्या पार्श्वभूमीवर ‘सावधान…

    Read More »
Back to top button