सामाजिक

  • मुखेड शहरात छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त भव्य शोभायात्रेने शहर दुमदुमले

    मुखेड (प्रतिनिधी) ०६ जून २५ राजमुद्रा सामाजिक संघटनेच्या वतीने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती मुखेड शहरात अत्यंत जल्लोषात आणि…

    Read More »
  • सातजन्माच्या गाठी अल्पकाळातच का सैल होतेय? नांदेडमध्ये वर्षभरात ३३० हून अधिक घटस्फोट; संवाद हरवतोय,शंका वाढतेय

    नांदेड – मोबाईलचा अतिरेक, संवादाचा अभाव, करिअरचा ताण, एकमेकांविषयी समजून न घेण्याचीवृत्ती… यामुळे नांदेडमध्ये सातजन्माच्या  गाठी अल्पकाळातच सैल होऊ लागली आहे. २०२४ मध्ये नांदेडजिल्हा कौटुंबिक न्यायालयात तब्बल ३३१ घटस्फोटाचे खटले दाखल झाले, तर यंदाच्या केवळ पाचमहिन्यांतच १६४ नव्या तक्रारी समोर आल्या आहेत. तुटलेली माणुसकीची नाळ, सोशल मीडियामधील आभासी जग, लॉक असलेले फोन, अपत्यावरूनहोणारे वाद, सासुरवाशीण संघर्ष, आर्थिक असमतोल – ही आधुनिक घटस्फोटाची नवी कारणं ठरतआहेत. ७० ते ८० टक्के प्रकरणांमध्ये म्युच्युअल सेपरेशन होत असून, कोर्टाऐवजी सामोपचारातून प्रश्नसोडवले जात आहेत. घटस्फोट आता फक्त वादामुळेच नव्हे, तर संवादाच्या अनुपस्थितीतही होतोय. “नात्यांमध्ये समजून घेणं, वेळ देणं आणि संवाद ठेवणं अत्यंत गरजेचं झालं आहे,” असं मत अ‍ॅड. प्रसाद रानवळकर यांनी व्यक्तकेलं. घर तुटू नये म्हणून संवादाचं बंधन मजबूत ठेवा – नाहीतर ‘सातजन्माची’ गाठ एका क्लिकवर तुटू शकते!

    Read More »
  • आज मुखेड येथे छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्त भव्य मिरवणूक व शोभायात्रेचं आयोजन 

    मिरवणूकीत नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे:-छत्रपती संभाजी महाराज सार्वजनिक जन्मोत्सव समिती मुखेड प्रतिनिधी:- २ जून २५  छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्त मुखेड शहरात आज २ जून २०२५ सोमवार रोजी भव्य मिरवणूक वशोभायात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे. यापूर्वी २६ मे रोजी नियोजित असलेली मिरवणूक पावसाच्याअंदाजामुळे पुढे ढकलण्यात आली होती .या ऐतिहासिक मिरवणुकीचे आयोजन धर्मवीर छत्रपती संभाजीमहाराज सार्वजनिक जन्मोत्सव समिती, राजमुद्रा सामाजिक संघटना, छावा संघटना, संभाजी ब्रिगेड, साईभक्त मित्र मंडळ आदींनी केलं असून, सायंकाळी ४.३० वाजता छत्रपती संभाजी महाराज स्मारक, बान्हाळी रोड येथून मिरवणुकीची सुरुवात होणार आहे. मिरवणुकीत शिवकालीन देखावे, घोडे–उंटांची मिरवणूक, मर्दानी खेळ, भजनी मंडळं, डीजे संगीत, आकर्षक पुतळा आणि पालखी मिरवणूक असे विविध आकर्षण देखावे असणार आहेत.या कार्यक्रमास शिवप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहनही…

    Read More »
  • नाशिक नर्सिंग अत्याचार प्रकरण: दोषी प्राचार्याचं रजिस्ट्रेशन व कॉलेजची मान्यता तात्काळ रद्द करण्याची शासनाकडे मागणी

    नांदेड प्रतिनिधी :- १ जून २५ नाशिकमधील गणपतराव आकडे खाजगी नर्सिंग कॉलेजमध्ये काही विद्यार्थिनींनी प्राचार्या विरुद्ध लैंगिक शोषणाची तक्रार केल्यानंतर शिक्षण क्षेत्र हादरून गेलं आहे. संबंधित प्राचार्यावर पोक्सो, एट्रोसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी अटक केली आहे. शिक्षणाच्या पवित्र क्षेत्रात असे प्रकार होणं म्हणजे विद्यार्थिनींच्या भविष्यातला अंधार आहे. हा प्रकार फक्त नाशिकपुरता मर्यादित नाही, संपूर्ण राज्यातील नर्सिंग शिक्षण संस्थांमध्ये याची चौकशी झाली पाहिजे. आदी बनसोडे यांनी इंस्टाग्राम , ट्विटर आणि अन्य सोशल मीडियावरही आवाज उठवला असून, त्यांचा आवाज राज्यभरात विद्यार्थिनी आणि नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण केली आहे. या गंभीर प्रकारावर आरोग्य समितीचे आदी बनसोडे यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली असून, त्यांनी शिक्षणआ णि आरोग्य विभागाकडे दोन ठोस मागण्या केल्या आहेत प्रमुख मागण्या खालील…

    Read More »
  • एसएफआयचे २५ वे नांदेड जिल्हा अधिवेशन मुखेड येथे संपन्न

    जिल्हा अध्यक्ष विजय लोहबंदे तर जिल्हा सचिव म्हणून मीना आरसे यांची निवड मुखेड (ता. २९) प्रतिनिधी :  स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय)चे २५ वे नांदेड जिल्हा अधिवेशन दि.२८ मे रोजी नांदेड जिल्ह्यातील मुखेड शहरात संपन्न झाले. या वेळी शहीद भगतसिंग यांना अभिवादन करून अधिवेशनाची सुरुवात करण्यात आली.  अधिवेशनाचे उद्घाटन एसएफआयचे माजी नेते आणि डीवायएफआयचे अंकुश माचेवाड यांनी केले. अधिवेशनास एसएफआयचे राज्य सचिव रोहिदास जाधव यांनी संबोधित केले तर शेतमजूर युनियनचे नेतेकॉ. विनोद गोविंदवार यांनी अधिवेशनाला शुभेच्छा दिल्या. अधिवेशन उद्घाटन सत्राच्या अध्यक्षस्थानीविजय लोहबंदे होते तर प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन प्रफुल्ल कऊडकर यांनी केले. अधिवेशनाच्या प्रतिनिधी सत्रात संघटनेचा कार्यात्मक, संघटनात्मक, आंदोलनात्मक आणि शैक्षणिकपरिस्थितीचा आढावा घेणारा अहवाल मांडण्यात आला. त्याआधी शोक ठराव घेऊन आदरांजलीवाहण्यात आली. अधिवेशनात वेगवेगळे ठराव पारित करण्यात आले. नवीन शैक्षणिक धोरण २०२० रद्दकरा, सर्व विद्यार्थ्यांना बस प्रवास निशुल्क करा, शासकीय आयटीआयचे खाजगीकरण थांबवा, जिल्हापरिषदेच्या शाळा वाचवण्यासाठी लढा तीव्र करा, विद्यार्थिनी व महिला अत्याचार विरोधी लढा तीव्र करा, यासहित विविध ठराव एकमताने या अधिवेशनात पारित करण्यात आले. या अधिवेशनाने एसएफआयची १८ सदस्यांची नवीन जिल्हा कमिटीची निवड केली. यामध्येएसएफआयचे नवनिर्वाचित जिल्हा अध्यक्ष म्हणून विजय लोहबंदे आणि जिल्हा सचिव म्हणून मीनाआरसे यांची एकमताने निवड करण्यात आली. जिल्हा उपाध्यक्षपदी प्रफुल्ल कऊडकर व स्वप्नील बुक्तरेतसेच जिल्हा सहसचिवपदी पवन जगडमवार व विकास गायकवाड यांची निवड करण्यात आली. जिल्हाकमिटी सदस्य म्हणून अक्षय सागरे, साहेबराव सोनसाळे, नितीन सोनकांबळे, अमोल गायकवाड, सोनलपाईकराव, नेहा कऊडकर, भारत पवार, शरद खंदारे, भीमराव सोनकांबळे यांची निवड करण्यात आलीआहे. ३ जागा रिक्त ठेवण्यात आल्या आहेत. अधिवेशनात जिल्ह्यातील वेगवेगळ्या शाळा आणि महाविद्यालयातून ८६ प्रतिनिधी सहभागी झाले होते. समारोपप्रसंगी नवनिर्वाचित जिल्हा सचिव आणि अध्यक्ष यांनी मनोगत व्यक्त केले. ‘हम होंगे कामयाब‘ या गीताने अधिवेशनाचा समारोप झाला. अधिवेशन यशस्वी करण्यासाठी मुखेड तालुक्यातीलएसएफआयच्या कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली. 

    Read More »
  • शेतकऱ्यांनी अधिकृत कृषी केंद्रातुनच खत, बियाणे खरेदी करावे:- कृषी अधिकारी नारनाळीकर

    ▫️मुखेड कृषी विभागाचे शेतकरी बांधवांना आवाहन ! ▫️बोगस बियाणे व खते विक्रीचा बाब निदर्शनास आल्यास तात्काळ कृषी कार्यालयाशी संपर्क साधा मुखेड -(ता. प्रतिनिधी) चालू वर्षातील खरीप…

    Read More »
  • सतत सुरू असलेल्या पावसामुळे तेंदू पत्यांचे मोठे नुकसान :-

    मुक्रमाबाद/प्रतिनिधी मागील चार दिवसापासून सतत सुरू असलेल्या पावसामुळे तेंदू पत्ता उत्पादनावर संक्रांत ओढावली असूनया मुळे तेंदु पत्त्याचे मोठे नुकसान झाले आहे. मुखेड तालुका हा डोंगराळ तालुका असून या तालुक्यात डोंगराळ भाग व जंगल मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे या तालुक्यात तेंदु पत्ता उत्पादन मोठ्या प्रमाणात होत असते. तालुक्यातील अनेक गावांमध्ये तेंदूपत्ता जमा करणारे मजूर मोठ्या प्रमाणात आहेत. या तेंदु पत्ता उत्पादनामुळे अनेक कुटुंबातील लोकांना भर उन्हाळ्यात काम मिळत असते व त्यांना चांगले उत्पादनही होत असते त्यामुळे प्रत्येक तेंदू पत्ता जमा करणाऱ्या मजुरांच्या घरात चांगली कमाई होते. भल्या सकाळी डोंगरात जाऊन तेंदू पत्ता जमा करून घेऊन यायचे व दिवसभर घरी बसून जुळवून, त्याचेपुडे बांधून मग सायंकाळी तेच तेंदू पत्ता संकलन केंद्रावर नेऊन देऊन घ्यायचे यामुळे शेकडो मजुराच्या हाताला भर उन्हाळ्यातही चांगलं काम मिळत असते. मुखेड तालुक्यातील हाळणी येथे मोठ्या प्रमाणात तेंदु पत्ता संकलन केले जाते या गावात दीडशे पेक्षाजास्त मजूर तेंदु पत्ता संकलन करतात पण मागील चार दिवसा पासून सुरू असलेल्या पावसामुळे तेंदू पत्ता संकलन करणाऱ्या मजुरावरही संक्रांत ओढावली असून त्यांनाही काम नसल्याने ते मजूर घरीच बसून आहेत. एकीकडे तेंदू पत्ता संकलन केंद्रावर जमा झालेल्या तेंदू पत्त्यावर मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यामुळे तेंदु पत्त्याचे लाखो रुपयाचे नुकसान होत असून पाऊस पडत असल्याने मजुरांच्या हातालाही काम मिळत नाही त्यामुळे मजूरही हताश झाले आहेत. अवेळी पडणाऱ्या पावसामुळे तेंदू पत्ता संकलन  करणाऱ्यांची मोठी पंचायत झाली असून या पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे.

    Read More »
  • शासनाच्या दर्लक्षामुळे राशन दुकानदारांचे नऊ महिन्यांचे कमिशन रखडले!

    मुखेड प्रतिनिधी :-  अन्नधान्य वितरणा बाबतचे कमिशन न मिळाल्याने स्वस्त धान्य दुकानदार आर्थिक अडचणीत आला आहे. शासनाने त्यांची आर्थिक कोंडी नकरता त्वरित निर्धारित कमिशन द्यावे, अशी अपेक्षा स्वस्त धान्य दुकानदारांनी केली आहे राज्य शासनाच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या वतीने विविध योजनाचे लाभार्थी व शिधापित्रका धारकांना, कुटुंब संख्येच्या आधारावर अन्नधान्य पुरवठा केला जातो. त्यासाठी गाविनहाय व शहरात प्रभाग निहाय स्वस्त धान्य दुकानदारा मार्फत शिधापित्रका धारकांना अन्नधान्य वाटप केले जाते. ह्यासाठी स्वस्त धान्य दुकानदारांना कमिशन म्हणून सरकारकडून काही रक्कम देण्यात येते. याच कमिशनवर स्वस्त धान्य दुकानदारांच्या संसाराचागाडा चालतो. गेल्या अनेक महिन्यांपासून धान्य वितरण प्रणाली सक्षमपणे काम करतांना दुकानदारांची दमछाक होत असली तरी मोबदला मिळत नसल्याने त्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. अनेक दुकानदारांचे उदरिनर्वाहाचे साधन आहे. दुकानाचे भाडे, लाईट बिल यासर्व गोष्टीसाठी पैसे लागतात. पण…

    Read More »
  • मुखेड मधील दोन विविधघटनेत वीज पडून १ म्हैस व ५ शेळ्यांचा मृत्यू

    तालुक्यातील दोन विविधघटनेत गावांमध्ये वीज पडून जनावरांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. यामध्ये एक म्हैस व पाच शेळ्यांचा मृत्यू झाला. मंगळवारी जांब (खु.) येथील शेतकरी गणेश शंकरराव गोंड यांच्या मालकीची म्हैस वीज पडून जागीच मरण पावली. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. तर दुसऱ्या घटनेत तग्याळ येथील शेतकरी मनोहर शंकर गोपनर यांच्या ५ शेळ्यांवर वीज पडल्याने मृत्यू झाला. मंगळवारी दुपारी अचानक वातावरणात बदल होऊन तालुक्यात विजांच्या कडकडाटासह वादळ वारेवाहून पावसास सुरूवात झाली. वादळी वाऱ्याने ग्रामीण भागातील काही ठिकाणच्या झाडांचे तर काही घरांवरील टिनपत्रे उडाली. तहसीलदार राजेश जाधव यांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, दोन्ही घटनांचा पंचनामा करून अहवाल वरीष्ठ कार्यालयात सादर करण्यात आला आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून योग्य मदत मिळावी, अशी मागणी होत आहे. 

    Read More »
  • महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीकडे नांदेड विमानतळ हस्तांतरण प्रक्रियेस प्रारंभ

    कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकांनी एमआयडीसी प्राधिकरणाला केल्या विविध सूचना तीन महिन्यानंतर हस्तांतरणाची कार्यवाही अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक स्वाती पांडे यांनी केली…

    Read More »
Back to top button